महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 13, 2020, 5:40 PM IST

ETV Bharat / city

"कामगार कायद्यातील बदलांना गोवा मंत्रिमंडळाची मंजुरी"

गोवा सरकारने आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक दोन फिजिओथेरपिस्ट आणि दोन रेडिओलॉजिस्ट यांची कंत्राटी पद्धतीने भरती तसेच लेखा विभागात 35 नव्या जागा तयार करून भरण्यासाठी मान्यता दिली आहे.

GOA CM PRAMOD SAWANT
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी - गोवा सरकारने आज विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोविड-19 च्या तयारीच्या प्रक्रियेला सरकारने मान्यता दिली आहे. तसेच अनेक प्रशासकीय निर्णयांना मान्यता दिली आहे. यामधील मोठा निर्णय म्हणजे कामगार, कारखाने आणि बाष्पक विभागाच्या कायद्यात केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार बदल करण्यात आले आहेत. पर्वरीतील सचिवालयात पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.

गोवा सरकारने आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक दोन फिजिओथेरपिस्ट आणि दोन रेडिओलॉजिस्ट यांची कंत्राटी पद्धतीने भरती तसेच लेखा विभागात 35 नव्या जागा तयार करून भरण्यासाठी मान्यता दिली आहे. तसा वटहुकूम काढण्यात आला आहे. यामध्ये कामगारांना 12 तास काम करावे लागेल ज्यामधील 4 तास हे अतिरिक्त कामचे (ओव्हरटाईम) असतील.

केंद्र सरकारने काही प्रवाशी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 16 मे रोजी दिल्लीहून राजधानी एक्स्प्रेस गोव्यातील मडगाव स्टेशनवर थांबणार आहे. यामधून 500 प्रवाशी गोव्यात येतील. ज्यांची मडगावातील जिल्हारुगणालयात कोविड चाचणी केली जाईल. ती निगेटिव्ह आल्यास ज्यांचे घर आहे त्यांना होमकोरनटाईन तर ज्यांची सुविधा नाही. त्यांना सरकारी कोरंटाईनमध्ये रहावे लागेल. या चाचणीसाठी बिगर गोमंतकीयांना 2 हजार रूपये मोजावे लागतील. तर विमानाने येणाऱ्यांची तपासणी विमानतळावर करून त्यानंतर बाहेर सोडले जाईल. जलमार्गाने येणाऱ्यांसाठी अशीच प्रक्रिया असेल, असेही सावंत यांनी सांगितले.

कोविडच्या स्थितीचा सामना करण्यासाठी गोवा पूर्ण सक्षम आहे. एका दिवसात 500 चाचण्या करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत 450 पर्यंत चाचण्या एकादिवसात करण्यात आल्या आहेत, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोव्याचा 80 टक्के महसूल कमी -

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोव्याचा विविध मार्गाने मिळणाऱ्या महसूलात 80 टक्के घट झाली आहे. यामध्ये वस्तू आणि सेवा कर, मुल्यवर्धित कर यांचाही समावेश आहे, असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिण्यात आले आहे. पुढील काळात पर्यटन उद्योगक्षेत्रात ही बदल होतील. पंतप्रधानांनी काल घोषित केलेल्या आर्थिक पॅकेज खूप महत्त्वाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details