नाशिक- जिल्ह्यामध्ये दोन दिवस झालेल्या मुसळधार पावासामुळे गंगापूर धरण 90 टक्के भरले. यामुळे धरणातून 43 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीला पूर आला. पुराचे पाणी शहरातील गंगापूर रोड भागातील नदीकाठच्या सोसायटी तसेच बंगल्यांमध्ये गेले. त्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना नाशिकच्या अग्निशामक दलाच्या बोटीच्या सहाय्याने सुरक्षित घराबाहेर काढण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा या गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिक घरात अडकून पडले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफचे पथक आणि भोसला मिलिटरीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून शेकडो नागरिकांना बोटीच्या साह्याने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले.