महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

टाळी एका हाताने वाजत नाही, भुजबळांची राज्यपालांवर टीका - अन्न आणि नागरी पुवठामंत्री छगन भुजबळ

गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झाले आहे. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचा देखील आहे. एका हाताने टाळी वाजत नाही, अशा शब्दात अन्न आणि नागरी पुवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका केली आहे.

Civil Supplies Minister Chhagan Bhujbal
Civil Supplies Minister Chhagan Bhujbal

By

Published : Feb 12, 2021, 8:54 PM IST

Updated : Feb 12, 2021, 8:59 PM IST

नाशिक -गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झाले आहे. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचा देखील आहे. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केले पाहिजे. एका हाताने टाळी वाजत नाही, अशा शब्दात अन्न आणि नागरी पुवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका केली आहे.

राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केले पाहिजे -

राज्यपालांच्या विमान प्रवासावरून सध्या राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. याबाबत शुक्रवारी नाशिक येथे बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत. प्रत्येकाची हक्क आणि कर्तव्य वाटून दिलेले आहेत. मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घ्यायचे आणि राज्यपालांनी ते मंजूर करायचे. मंत्रिमंडळ हे या राज्याचे प्रमुख कारभारी आहेत. त्याच्या पाठीमागे उभे राहणे हे राज्यपालांचे काम आहे. राज्यपालांचा जसा मान आहे. तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केले पाहिजे असे भुजबळ यानी मत व्यक्त केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ
राज्यपालांनी राजकारण करू नये -
दिलेल्या 12 विधानपरिषदेच्या आमदारांच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेल नाही, असे भुजबळ म्हणाले. तसेच राज्यपाल आणि सीएमओ या दोघांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांनी राजकारण करू नये. यावेळी बोलताना त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले मी 1985 पासून विधानमंडळात आहे. मात्र, असे कधीही घडलेले मला आठवत नाही. मुख्यमंत्र्यानी नाव पाठवल्यावर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी आमदारांच्या नावावर सही व्हायची. अटलजींच्या, शिवसेनेच्या काळातदेखील असेच होते. 1995 साली काँग्रेसप्रणित राज्यपाल होते. त्यावेळी अचानक सरकार बदलले. मात्र तरी सुद्धा राज्यपालांनी तत्काळ त्यावर सही केली. त्यामुळे राज्यात कोण जास्त राजकारण खेळतंय हे पाहणं गरजेचं असल्याचे भुजबळ यानी सागितले आहे.
पडळकर मोठे नेते -
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयाचे अनावरण केले. मात्र या पुतळयाचे अनावरण शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, राजकारणात काही पथ्ये पाळायची असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण आता काय बोलणार, ज्यांनी हा सोहळा उरकला ते मोठे नेते आहेत असे सांगत हे चित्र महाराष्ट्राला शोभणारे नाही अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक नेतावर ईडीची कारवाई झाली त्यावर भुजबळ यानी प्रतिक्रिया दिली आहे भुजबळ म्हणाले की, ईडीची बिडी सगळ्यांना जाळत सुटलेली आहे.
Last Updated : Feb 12, 2021, 8:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details