महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bharat Jodo Yatra Yogendra Yadav : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला समर्थन का दिली, योगेंद्र यादव यांनी स्पष्टच सांगितले? - भारत जोडो यात्रा महाराष्ट्र संयोजक योगेंद्र यादव

योगेंद्र यादव भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र संयोजक (Maharashtra coordinator of Bharat Jodo Yatra) आहेत. आपल्या देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या राजकीय प्रवासात सहभागी झालेलो आहोत. ते आज भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने नागपुरात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत (Yogendra Yadav statement in press conference) होते.

Yogendra Yadav
योगेंद्र यादव

By

Published : Oct 14, 2022, 9:32 AM IST

नागपूर :ज्यावेळी आपल्या घराला आग लागली असेल, तेव्हा ज्याच्या हातात पाणी असेल त्याच्याकडे धाव घ्यावी लागते. देशात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला समर्थन दिल्याची भूमिका राजकीय विचारवंत-विश्लेषक स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी विषद केली आहे. ते आज भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने नागपुरात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत (Yogendra Yadav statement in press conference) होते. योगेंद्र यादव भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र संयोजक (Maharashtra coordinator of Bharat Jodo Yatra) आहेत. आपल्या देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या राजकीय प्रवासात सहभागी झालेलो आहोत. अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली.


भारत जोडोला जनसमर्थन मिळेल -राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. महाराष्ट्रात यात्रा दाखल होण्यापूर्वी वातावरण निर्मिती करण्यासाठी संयोजक योगेंद्र यादव सक्रिय झाले आहेत. आज दक्षिणायन महाराष्ट्र विभागाची बैठक पार पडली. त्यात भारत जोडो यात्रेची रूपरेषा ठरवण्यात आली असून या यात्रेला महाराष्ट्रात मोठया प्रमाणात जनसमर्थन मिळेल, असा दावा त्यांनी केला (Yogendra Yadav statement in press conference) आहे.

प्रतिक्रिया देताना योगेंद्र यादव


आरएसएसवर योगेंद्र यादवांचा प्रहार -भारत जोडो यात्रेचे यश काय ? जर असे कुणी विचारले तर ते - म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मुस्लिम समाजासोबत संवाद साधण्याची गरज भासली आहे. त्यांना आता देशात गरीबी, बेरोजगारी, भूकमरी, आर्थिक विषमता दिसू लागली आहे. योगेंद्र यादव यांनी आरएसएसवर प्रखर टीका केली (Bharat Jodo Yatra Yogendra Yadav statement) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details