महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Indian Independence Day स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता आले याचा सार्थ अभिमान - शेषराव मुरकुटे

स्वातंत्र्य लढ्यात नागपुरच्या शेकडो शूरवीर योद्धांनी आपले योगदान दिले आहे. त्यापैकीच एक म्हणजे स्वातंत्र्य सैनिक शेषराव मुरकुटे ( Freedom fighter Seshrao Murkute ) हे देखील आहेत. शेषराव विश्वनाथ मुरकुटे ( Saluting Bravehearts ) आज ९१ वर्षांचे झाले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झाली आहेत. मात्र, या ७५ वर्षांच्या काळात स्वातंत्र्याचा अर्थच बदलून गेलाच ते नमूद करतात.

By

Published : Aug 11, 2022, 3:11 PM IST

Updated : Aug 11, 2022, 5:48 PM IST

Saluting Bravehearts
Saluting Bravehearts

नागपूर -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने स्वातंत्र्य लढ्यातील योद्धांनी देशासाठी केलेला त्याग, समर्पण आणि बलिदानाचे स्मरण केले जात आहे. स्वातंत्र्य लढ्यात नागपुरच्या शेकडो शूरवीर योद्धांनी आपले योगदान दिले आहे. त्यापैकीच एक म्हणजे स्वातंत्र्य सैनिक शेषराव मुरकुटे ( Freedom fighter Seshrao Murkute ) हे देखील आहेत. शेषराव विश्वनाथ मुरकुटे ( Saluting Bravehearts ) आज ९१ वर्षांचे झाले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झाली आहेत. मात्र, या ७५ वर्षांच्या काळात स्वातंत्र्याचा अर्थच बदलून गेलाच ते नमूद करतात. आज ईटीव्ही भारतकडून त्यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेषराव तरुणाच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यावेळी ते जखमी देखील झाले होते. आज वयाची ९१ वर्ष पूर्ण केल्यानंतर देखील स्वातंत्र्याचे महत्त्व अबाधित असल्याचे ते म्हणाले आहेत. नव्या पिढीने सुद्धा आपल्या देशासाठी बलिदानाची सर्वोच्च परंपरा यापुढेही सुरू ठेवावी, अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया देताना स्वातंत्र्य सैनिक शेषराव मुरकुटे


वडिलांकडून मिळाली होती प्रेरणा :माझे वडील देखील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. त्यांना ब्रिटीशांनी अटक केली होती. त्यांचा संघर्ष माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला. त्यामुळे मी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्याचे शेषराव मुरकुटे यांनी सांगितले. 1932 मध्ये स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. गोवा मुक्ती आंदोलनात नागपूर येथून 60 जणांचा सहभाग झाले. यावेळी त्यांनी या आंदोलनातील अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, मलाही गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झाल्याचा अभिमान आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मी ते बघू शकतो याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



असा होता त्यांचा प्रवास :गोवा मुक्ती आंदोलनात नागपूर येथून प्रवास केल्यानंतर पुणे येथे जयवंतराव टिळक यांच्या मार्फत झालेले मार्गदर्शन, बेळगाव पर्यंतचा प्रवास, दर स्टेशनवर उस्फूर्तपणे होणारी मदत, ज्येष्ठ नेते राम मनोहर लोहिया यांचा प्रभाव, स्थानिक लोकांनी दिलेले प्रेम, दशरथ हिराराम माळी या आपल्या सहकार्याला लागलेली गोळी त्यावेळी झालेली पोर्तुगाल सैनिकां सोबतची झटापट, अशा कितीतरी आठवणी यावेळी सांगितले.

हेही वाचा -Amrit Mahotsav of Independence गरिबांचा अन्नदाता असलेल्या पांडुरंग खानखोजेंनी देशाबाहेर राहून दिला स्वातंत्र्यांचा लढा

Last Updated : Aug 11, 2022, 5:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details