महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Paramilitary Exam Candidates Agitation : वर्दी द्या, नाही तर अर्थी न्या म्हणत नागपुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन

काही विद्यार्थ्यांनी उपाशी राहून तर काहींनी बसून सहभाग घेत आंदोलन ( Paramilitary Exam students agitation ) सुरू केले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर होत आहे. दिल्लीत आंदोलनाला न्याय न मिळाल्याने आता विद्यार्थ्यांनी नागपुरात आंदोलन सुरू ( Students agitation for job in Nagpur ) केले आहे

By

Published : Apr 9, 2022, 5:36 PM IST

Updated : Apr 9, 2022, 6:01 PM IST

विद्यार्थ्यांचे आंदोलन
विद्यार्थ्यांचे आंदोलन

नागपूर - अर्धसैनिक बलाच्या भरतीप्रक्रियेत ऐनवेळी डावलण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा ( Paramilitary Exam Candidates Agitation ) पवित्रा घेतला. दिल्लीत वर्षभर आंदोलन केल्यानंतर मागील 35 दिवसांपासून नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन ( Sanvidharn Chauke Nagpur agitation ) सुरू आहे. एकतर वर्दी, नाहीतर अर्थी ( (मृतदेह) ) न्या, हा निर्धार करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या विषयी विशेष रिपोर्टमधून माहिती जाणून घेऊ.

काही विद्यार्थ्यांनी उपाशी राहून तर काहींनी बसून सहभाग घेत आंदोलन ( students agitation in Nagpur ) सुरू केले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर होत आहे. दिल्लीत आंदोलनाला न्याय न मिळाल्याने आता विद्यार्थ्यांनी नागपुरात आंदोलन सुरू ( Students agitation for job in Nagpur ) केले आहे. यात सुरुवातीला सात जणांनी आंदोलन सुरू केले. आता यात 30 ते 40 जणांनी उपोषण केले. तर उर्वरित 70 ते 80 विद्यार्थ्यांना आंदोलनात आपला सहभाग देत आंदोलन सुरू केले. घरापासून दूर राहुन सुरू केलेल्या आंदोलनाला इतर राज्यातील काही विद्यार्थी घेत आहेत. यात पंजाबसह अन्य काही राज्याचे मुलेही आंदोलनात सहभागी होत आहेत.

नागपुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन

काय आहे परीक्षा प्रकरण? -स्टाफ सीलेक्शन कमिशनकडून जुलै 2018 मध्ये 60 हजार 2010 जागा अर्धसैनिक बल परीक्षेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. 11 फेब्रुवारी ते 25 मार्च 2019 या कालावधीत लेखी परीक्षा घेत 21 जून 2029 ला निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाररिक परीक्षा परीक्षा 13 ऑगस्ट 25 सप्टेंबर दरम्यान पार पडली. वैदकीय तपासणी 9 जानेवारी ते 13 फेब्रुवारी ते 19 पार पडली. निकाल जाहीर होऊन नोकरीचे नियुक्तीची वाट पाहत असताना मेरिट लिस्ट कमी करत 60 हजार 210 जागेसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांमधून 5 हजार 210 विद्यार्थी यांना बाजूला केले. तर 55 हजार विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात आले.

सलाईन घेऊन आंदोलन सुरूच- नागपुरात सध्याच्या घडीला तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. यात नाशिक भारती पवार ही मुलगी मागील 20 दिवसात दोन वेळा प्रकृती बिघडल्याने दवाखान्यात दाखल झाली. तरी ती हार न मानता सलाईन घेऊन आंदोलनात सहभाग झाली आहे. दिवसभर उन्हाच्या तडाख्यात थांबून हे आंदोलक पेंडॉलमध्ये बसतात. रात्र होताच संविधान चौकात बिछाना मांडून रात्र काढत आहेत. या परिस्थितीत रोज दोन ते तीन विद्यार्थ्यांना प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल होत आहेत. अनेक विद्यार्थी कधी जेवणाची सोय न झाल्याने उपाशीच राहून आंदोलन करत असल्याचे कडूबा राठोड सांगतो.

वर्दी द्या नाही तर अर्थी न्या- दिल्लीत अनेक महिने आंदोलन करून काहीच मार्ग निघाला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटून न्याय देण्याची मागणी केली. पण अखेर पोलिसांनी दडशाही करत आंदोलन दडपले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यात 35 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यामुळे एक तर वर्दी द्या नाही तर आमची अर्थी (मृतदेह) न्या, असा निश्चय करून नांदेडचा निलेश मोरे उपोषणाला बसला आहे.

हेही वाचा-Mumbai Bank Case : प्रवीण दरेकर हजर व्हा, मुंबई पोलिसांची चौकशीसाठी नोटीस

हेही वाचा-Maharashtra Kesari : कोण होणार महाराष्ट्र केसरी?; 'या' दोन दावेदारांवर नजर

हेही वाचा-Gunaratna Sadavarte Police Custody : गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसाची पोलीस कोठडी; इतर 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

Last Updated : Apr 9, 2022, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details