नागपूर : रुग्णालयात डॉक्टरांना देवाचा दुसरं रूपच मानले जाते. यासोबतच रुग्णालयात रुग्ण सेवा करणाऱ्या परिचारिकाना नर्स किंवा सिस्टर म्हणजे त्यांना बहिणींचा दर्जा दिला आहे. दोन वर्षांनी यंदा 12 मे रोजी जागतिक नर्सेस डे साजरा होत आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या महामारीत रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टच्या खांद्याला खांदा लावून रुग्ण सेवा देणाऱ्या परिचारिकासाठी आनंदाचा आणि खास दिवस ( International Nurses Day 2022 ) आहे. यावर नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात ( Indira Gandhi Medical College ) सेवा देणाऱ्या परिचारिकाचा अनुभव जाणून ( Nurses Experiences During Covid Period ) घेतलाय ईटीव्ही भारताच्या खास रिपोर्ट मधून..
जागतिक नर्स दिवस साजरा होताना नागपूरात कोरोनाच्या दिवस कायमचे स्मरणात राहणारे आहे. कोरोनाच्या काळात जिथे कोणीही मदत करू शकत नव्हते, आप्तस्वकीय पोहचू शकत नव्हते तिथे परिचारिकानी रुग्णसेवा करत अनेकांना आधार दिला. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी अनुभव कथन केलेत. सहाय्यक अधिसेविका ममता ठवरे यांनी सांगितले की, रुग्णसेवा करण्याचे ध्येय घेऊन या क्षेत्रात आले. महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयात रुग्णसेवा केल्याचे समाधान आहे. पण कोरोनातील दोन वर्षे हे वेगळ्या अनुभवाची शिदोरी देणारे आहे. सहकारी परिचरिकेने एकमेकास साह्य करत या महामारीत उत्तम काम करत रुग्णसेवा केल्याचा आनंद आहे. काम करता करता कोरोना पॉझिटिव्ह झाले. प्रत्येकाने घरच्यांची कुठलीही चिंता न करता आपले काम चोख बजवल्याने रुगणालयात सेवा देऊ शकलो आणि रुग्णाचे हसरे चेहरे आमच्यासाठी समाधान देणारे होते असे ममता ठवरे यांनी सांगितले.
बेड अपुरे असतांना स्टाफ नसतांना रुग्णसेवा दिली :यंदा दोन वर्षांनी का होईना 12 मे जागतिक नर्सेस दिवस उत्साहात सजारा करण्याचा निर्धार केला. आजचा दिवस विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. कोरोना वार्डात कर्तव्य 281 परिचारिकांनी केले. 500 पेक्षा बेडचे रुग्णालयात मागे न हटता 115 पद रिक्त असताना काम केले. कामाचा ताण न विचारता घेता एका- एका परिचरिकेने 35 ते 40 रुग्ण एकाच शिफ्टमध्ये सांभाळण्याचे काम केले. मागील 29 वर्षांपासून प्रदीर्घ काळ रुग्णसेवेच अनुभव असलेल्या विभागीय परिचारिका चंद्रकला परतेकी यांनी अशी महामारी पाहिलीच नाही. सामान्य रुग्णासोबत कोरोना रुग्ण सांभाळण्याचे काम दुसरीकडे घराची जबाबदारी, घरात कोणाला कोरोना होऊ नये यासाठी वेगळाच ताण मनावर असयचा, असे परतेकी सांगतात.