महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Atul Londhe Nagpur : पेगासस हेरगिरी प्रकरणाची सखोल चौकशी करा - अतुल लोंढे - फोन टॅपिंग प्रकरण

चौकशी समितीच्या अहवालात केवळ रश्मी शुक्ला यांना दोषी धरून चालणार नाही. कारण केवळ एक अधिकारी इतकी मोठी हिम्मत करणार नाही. पण यामध्ये आणखी काही लोकांचे हात गुंतले आहे. यासाठी या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या आदेशानुसार ही फोन टॅपिंग करण्यात आली, त्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

अतुल लोंढे
अतुल लोंढे

By

Published : Feb 28, 2022, 4:47 PM IST

Updated : Feb 28, 2022, 4:56 PM IST

नागपूर -पेगासस हेरगिरी प्रकरणात चौकशीसाठी नेमलेल्या नियुक्त समितीच्या अहवालानंतर तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ज्यांनी या हेरगिरीचे आदेश दिले, त्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. तसेच येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा रेटून धरला जाईल, असेही अतुल लोंढे म्हणाले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

माध्यमांना माहिती देताना अतुल लोंढे
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतांना हेरगिरीचा गुजतरात पॅटर्न 2017 आणि 2018 मध्ये राबत राजकीय नेत्यांचे फोन नंबर देऊन त्यांच्या आणि कुटुंबियांवर पाळत ठेवत खासगी जीवनात ढवळा ढवळ करण्यात आली. त्यामुळे अशा पद्धतीने पदाचा गौरवापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या चौकशी समितीच्या अहवालात केवळ रश्मी शुक्ला यांना दोषी धरून चालणार नाही. कारण केवळ एक अधिकारी इतकी मोठी हिम्मत करणार नाही. पण यामध्ये आणखी काही लोकांचे हात गुंतले आहे. यासाठी या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या आदेशानुसार ही फोन टॅपिंग करण्यात आली, त्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 28, 2022, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details