महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण हा काळा दिवस - देवेंद्र फडणवीस - Winter session

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळाले नाही. त्यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली असल्याने, मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण हे काळा दिवस असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 19, 2019, 2:39 PM IST

Updated : Dec 19, 2019, 3:07 PM IST

नागपूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही बोलले नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले तसे भाषण महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही झालेले नाही. त्यांचे भाषण हा काळा दिवस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईकर आज रस्त्यावर उतरणार; मुंबई पोलीस सज्ज

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज गुरूवारी चौथा दिवस आहे. सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या ठरावावर उद्धव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मात्र यावर नाखुष होत, विरोधी पक्षाने सभा त्याग केला. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळाले नाही. त्यांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली असल्याने, मुख्यमंत्र्याचे आजचे भाषण हे काळा दिवस असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा... विधान परिषदेच्या कामकाजचा चौथा दिवस, लक्षवेधीने होणार महत्वाच्या विषयावर चर्चा

मुख्यमंत्र्यांचा भाषण हे शिवाजी पार्कवरच भाषण वाटले - फडणवीस

मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांसाठी काही तरी बोलतील असं वाटले होतं. मात्र तसे काहीही घडले नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांचे आजचे भाषण हे सभागृहातलं भाषण नसून शिवाजी पार्कवर केलेले भाषण वाटले, असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

हेही वाचा... नागरिकत्व (सुधारणा) कायद्यावरून इम्रान खान यांची भारताला अणुयुद्धाची पुन्हा एकदा धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ आपली खुर्ची वाचवण्याची कवायत करत आहेत. आपल्या बाजुला बसलेले पक्ष कसे खुश राहतील, त्यांचे मन कसे राखले जाईल, याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिले जात नाही. म्हणूनच आम्ही सभात्याग केला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? असा सवालदेखील फडणवीस यांनी यावेळी केला.

Last Updated : Dec 19, 2019, 3:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details