मुंबईयंदा पितृ पक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, पितृसत्ताक काळात आत्म्याच्या शांतीसाठी, पितरांना खाऊ घातले जाते. पितृ पक्षाला कावळ्याचे विशेष महत्त्व Crow Important In Pitru Paksha आहे. कावळा हा यमाचे प्रतीक मानले जाते. श्राद्ध पक्षात आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला अन्न देत असतो. पितृ पक्षाच्या काळात घराच्या अंगणात कावळा येऊन बसला असेल, तर ते शुभ मानले जाते. तसेच दिलेले धान्य हे कावळ्याने खाल्ल्यास our ancestors come to eat food, आपले पुर्वज येऊन आपल्याला आर्शिवाद in the form of crows देऊन गेले, असे म्हणतात. Pitru Paksha 2022
कावळा हे यमराजाचे प्रतीकशास्त्रानुसार कावळा हा यमराजाचा दूत मानला जातो. हिंदू धर्मात कावळ्याला अधिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, कावळे नैसर्गिकरित्या मरत नाहीत. कावळा रोगाने व म्हातारपणाने मरत नाही. त्यांचा मृत्यू अपघाती आहे. असे म्हणतात की, कावळा मेला की, त्याचे बाकीचे साथीदार त्या दिवशी अन्न खात नाहीत. प्राचीन शास्त्रानुसार यमाने कावळ्याला वरदान दिले होते की, तुला दिलेले अन्न पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देईल. तेव्हापासून ही प्रथा चालू आहे. शास्त्रानुसार, श्राद्ध केल्यावर ब्राह्मणाला जेवण देणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच कावळ्याला खायला देणे देखील आवश्यक आहे. असे मानले जाते की, कावळे आपल्या पूर्वजांचे रूप धारण करतात आणि या काळात आपल्यासोबत उपस्थित राहतात.
कोणत्याही पक्ष्याला अन्न दिले जाऊ शकतेपितृ पक्षात कावळे, कुत्रे आणि गायींचे असे एक-एक जेवनाचे पान वाढतात. जर कावळे उपलब्ध नसतील तर, कोणत्याही पक्ष्याला खायला दिले जाऊ शकते. परंतु कावळ्यांना खाऊ घालणे कधीही चांगले. गरुड पुराणात लिहिले आहे की, कावळा हा यमराजाचा दूत आहे. श्राद्ध पक्षात कावळ्यांना खायला घातल्याने, यमलोकातील पितरांना समाधान मिळते.
शास्त्रानुसार, श्राद्ध केल्यावर ब्राह्मणाला जेवण देणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच कावळ्याला खायला देणे देखील आवश्यक आहे. असे मानले जाते की, कावळे आपल्या पूर्वजांचे रूप धारण करतात आणि या काळात आपल्यासोबत उपस्थित राहतात. बदलत्या काळात होत असलेल्या औद्योगिकीकरणाचा परिणाम पितृपक्षातही दिसून येतो.