महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हार मी विनम्रपणे स्वीकारली, लोकशाहीत लोकांचा निर्णय अंतिम असतो - उर्मिला

या निकालानंतर मी हरलेली व्यक्ती दिसून आली नाही. याच प्रतिमेने मी राजकारणात सक्रीय असेल.

By

Published : May 23, 2019, 8:37 PM IST

काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर

मुंबई- लोकशाहीत लोकांचा निर्णय हा अंतिम असतो. या मतमोजणीत घोळ झाला आहे. त्याबाबतचा अहवाल तयार करून तो निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. तसेच जे पण सत्य आहे, ती हार विनम्रपणे स्वीकारली असल्याचे काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.

गोरेगावच्या नेस्को येथील मतमोजणी केंद्राला भेट दिल्यावर उर्मिला यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज उत्तर मुंबईतील मतमोजणीचा जो निकाल त्याबाबत कारण देत रडत बसणार नसल्याचे देखील उर्मिलाने म्हटले.

काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर
उत्तर मुंबईचे जवळपास विजयी ठरलेले भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे उर्मिलाने अभिनंदन केले. उर्मिलाला मतदान केलेल्या मतदारांचे देखील उर्मिलाने आभार मानले.या निकालानंतर मी हरलेली व्यक्ती दिसून आली नाही. याच प्रतिमेने मी राजकारणात सक्रीय असेल. लोकांनी मला मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला. राजकारण सोडणार नसून सतत सक्रिय राहणार असल्याचे उर्मिलाने या निकालानंतर स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details