महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 2, 2020, 3:11 PM IST

Updated : Sep 2, 2020, 4:12 PM IST

ETV Bharat / city

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय उद्या; राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंतांची माहिती

३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यापूर्वीच‌ दिल्या आहेत.

उदय सामंत
उदय सामंत

मुंबई - 'सर्व विद्यापाठांचे कुलगुरू जे निर्णय घेतायेत ते त्यांना घेऊ द्यावेत, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. राज्यपालांच्या मते, परीक्षा साध्या सोप्या पद्धतीने कशा घेता येतील त्याबाबत विचार केला पाहिजे. त्यामुळे याबाबत ते स्वतः उद्या कुलगुरुंची बैठक घेणार असून त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल.' अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सांगितले आहे. विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही, असा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी काळजी करू नये, या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व विद्यापीठ परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

हेही वाचा - दुसऱ्या महायुद्धाची पंच्याहत्तरी: ज्यू नागरिकांचे शिरकाण; मानवतेला काळीमा फासणारी घटना

३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यापूर्वीच‌ दिल्या आहेत.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि अ‌ॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी स्पष्ट‌ केले आहे. बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल, अशा विविध विषयांवर कुलगुरू आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांची चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा राज्यपाल कुलगुरुंशी चर्चा करून परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असे मंत्री सामंत यांनी शेवटी स्पष्ट केले.

हेही वाचा -मुंबईत चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated : Sep 2, 2020, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details