मुंबई -आज राज्यात ५,४३९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७,८९,८०० वर पोहचला आहे. राज्यात आज ३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६,६८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८३,२२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत,
- राज्यात ८३,२२१ अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ४,०८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १६,५८,८७९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०३,६६,५७९प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८४,३६१ नमुने म्हणजेच १७.२७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,३६,६४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर ६,२२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८३,२२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
- कधी किती रुग्ण आढळून आले -