मुंबईशिंदे फडणवीस शासनाचे पहिले पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. यात आदिवासी विकास मंत्री विजय गावित Tribal Minister Vijay Kumar Gavit यांनी धक्कादायक विधान केले. त्यांचे म्हणणे होते कि, राज्यात कुपोषण बिलकुल नाही. The Shinde government says there is no malnutrition in the state मात्र त्यांच्या या विधानावर विरोधी पक्ष नेते अजित पवार Opposition leader Ajit Pawar यांनी आक्षेप देखील घेतला होता. तर केंद्र शासनाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात वय पाच वर्ष आणि वय १५ ते ४९ ह्या गटातील जनतेत कुपोषण गंभीर आहे. कुपोषणाचे विविध प्रकार केंद्र सरकारने अहवालात नमूद केले आहे. महाराष्ट्रात पाच वर्षाखालील खुजे असलेल्या मुलांची टक्केवारी 41 टक्के आहे.
उंचीच्या मानाने वजन नसणे ३२ टक्के बालके, अत्यंत कमी वजनाची बालके 46 टक्के तसेच 15 ते 49 वयोगटातील पुरुषांचे कुपोषण 23 टक्के. तर त्याच वयोगटातील महिलांचे कुपोषण ३० टक्के असल्याचे केंद्र शासन ताज्या अहवालात नमूद आहे. तेव्हा आदिवासी मंत्री यांचा दावा केंद्र शासनाच्या आदिवासी राज्य मंत्री रेणुका सिंह Union Minister of State for Tribals Renuka Singh यांनी दिलेल्या आकडेवारीत सपशेल खोटा असल्याचं वास्तव समोर येत. ह्या बाबत आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या मुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले कि, महाराष्ट्र सरकारचे आदिवासी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करीत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यात कुपोषण आहे हि बाब सर्वाना माहिती आहे . मात्र मंत्री खोटे बोलत आहेत.
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे त्यामध्ये वाढ देखील झालेली आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी पाच कोटी लोक शहरांमध्ये राहतात .तर सात कोटी पेक्षा अधिक लोक ग्रामीण भागात राहतात . महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले विकसित राज्य आहे. अर्थव्यवस्थेचे इंजिन महाराष्ट्रातूनच जाते.महाराष्ट्रात प्रतिव्यक्तीचे सकल घरेलू उत्पादन एक लाख ४८ हजार रुपये इतके आहे. मात्र त्या तुलनेत शासन चार आणे देखील खर्च करत नाही. राज्य शासन सार्वजनिक आरोग्याच्या उभारणीसाठी, सक्षमीकरणासाठी फार काही करत नसल्याचे अभ्यासक आणि जनता दोघेही म्हणत आहे.