Prakash Ambedkar On OBC Reservation : सरकारने ओबीसी आरक्षणाचं खोबरं करायचं ठरवलंय; प्रकाश आंबेडकरांची टीका - prakash ambedkar in nanded
ओबीसींवर मुस्लिमांनी अन्याय केला नसून उच्च वर्णीय हिंदू लोकांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांना कधीही निकाली काढायचा नाही. तर त्यांना देशातून पूर्ण आरक्षण बंद करण्याचा अजेंडा आरएसएसचा आहे. त्यामुळे जोपर्यंत यांना सत्तेवरून हटवत नाही, तोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार असेही (Prakash Ambedkar On OBC Reservation ) आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar
नांदेड - सरकारने ओबीसी च्या (OBC Reservation) राजकीय आरक्षणाचं खोबरं करायचं ठेवलंय. असा घणाघात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on OBC Reservation) यांनी केला आहे. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात मांडला आहे. यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. याला भाजप देखील दोषी आहे. इम्पेरीकल डेटा सहज मिळाला असताना मात्र तो केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला नाही. अशी टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलताना
राज्यातलं सरकार हे बहुजन जनतेचं नसून श्रीमंत मराठ्यांचे आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केली आहे. श्रीमंत मराठ्यांना कोणालाही आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून मागासवर्गीय आयोगाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात तो मांडला गेला. शेवटी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) श्रीमंत मराठ्यांनी घालवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
उच्चवर्णीय हिंदूंनी अन्याय केला
ओबीसींवर मुस्लिमांनी अन्याय केला नसून उच्च वर्णीय हिंदू लोकांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांना कधीही निकाली काढायचा नाही. तर त्यांना देशातून पूर्ण आरक्षण बंद करायचं आहे असा अजेंडा आरएसएसचा आहे. त्यामुळे जोपर्यंत यांना सत्तेवरून हटवत नाही, तोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार असेही आंबेडकर म्हणाले.
भाजपा आणि राष्ट्रवादी सोडून कोणासोबतही युती
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयारी आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. कॉंग्रेसने समाधानकारक जागा दिल्या तर आम्ही कॉंग्रेस किंवा शिवसेनेसोबत निवडणुका लढवू असेही आंबेडकर म्हणाले.