मुंबई - राज्यात कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारने अनेक नियमांत शिथिलता आणली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या. उद्यापासून राज्यातील मंदिरे खुली होत आहेत. अनेक महिन्यापासून मंदिरेही बंद होती, मात्र अखेर राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर प्रवेश सुरू होणार आहे. मात्र अटी-शर्तींसह हा प्रवेश मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर ती मंदिरात साफसफाई सुरू करण्यात आलेली आहे. अनेक मंदिरामध्ये आज सकाळपासूनच जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. वडाळा येथील प्रतिपंढरपूर वडाळा विठ्ठल मंदिरदेखील सकाळपासूनच मंदिर व्यवस्थापनाने साफसफाईला सुरुवात केली होती.
कोविड-19 संकटामुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे, धार्मिक स्थळे उद्यापासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी कोविड-19 नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. उद्या, गुरुवार, 7 ऑक्टोबर नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर मंदिरे भाविकांसाठी खुली होणार आहेत. उद्या मुंबईमधील सिद्धिविनायक आणि मुंबा देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार असून केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे.
हे ही वाचा -#नवरात्रोत्सव2021 : 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' विशेष कार्यक्रम पाहा, फक्त 'ईटीव्ही भारत'वर
मंदिरात आम्ही एका वेळी 25 जणांना आत सोडणार आहोत मात्र नियमाचे पालन हे भाविकांना करावं लागणार आहे. भाविकांना मूर्तीला स्पर्श करता येणार नाही. प्रसाद दिला जाणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत त्यांनाच मंदिरात येण्यास परवानगी असेल. येताना त्यांनी प्रमाणपत्र आणणे अनिवार्य असेल. जर 2 डोस नसेल तर आरटीपीसीआर करणे आवश्यक आहे. उद्याची संपूर्ण तयारी झाली आहे. असे उदय दिघे यांनी सांगितले.
ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या भाविकांनाच मिळणार साईदर्शन, शनिदर्शनासाठी ऑफलाइन पद्धत
शिर्डी(अहमदनगर) - साईबाबा मंदिर येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे. त्या दृष्टीने दिवसाला 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन बुकींग करुनच साईदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला 10 हजार ऑनलाइन आणि पाच हजार ऑफलाइन पासेस देऊन दर्शन देणार असल्याचे साई संस्थानने जाहीर केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काही तासाच्या आतच हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यानुसार आता 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन बुकींग करुनच साईदर्शन घेता येणार आहे. तसेच साई संस्थानने प्रसादालय सुरू ठेवण्याचा निर्णयही आता रद्द करण्यात आला आहे.
शनिशिंगणापुरात थेट मिळणार दर्शन -