मुंबईरायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले Security personnel deployed on a beach in Raigad आहे. गुरुवारी तीन एके ४७ रायफल असलेली एक संशयास्पद बोट जप्त करण्यात आली suspicious Boat find in Raigad आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दक्षता घेण्यात येत आहे.
हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर बोट संशयास्पदरित्या Suspected Boat In Raigad आढळल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबईत हाय अलर्ट जारी High alert issued in Mumbai करण्यात आला आहे. बाेटीची माहिती मिळताच रायगड जिल्हा पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली Mumbai High alert आहे. बोटीमध्ये AK47 रायफल सापडल्या आहेत. NSG टीम रायगडात दाखल झाली आहे.
रायगड किनाऱ्यावर काल जप्त केलेल्या तीन एके ४७ रायफलसह संशयास्पद बोटीतील साहित्य सुरक्षा कर्मचाऱ्याने काढले आहे.
नाकाबंदी व हायअलर्ट उपमुख्यमंत्री फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, जिल्हा रायगड या किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत मच्छीमारांना सापडली. यासंदर्भात तत्काळ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्या बोटीमध्ये तीन एके रायफल व रायफल दारूगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येत असताच समुद्रकिनाऱ्यावर नाकाबंदी व हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बोट ऑस्ट्रेलियन मालकीचीयाबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांना कल्पना देण्यात आली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडीहान आहे. या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन महिलेची असून तिचे नाव हाना लॉर्डरगन असे आहे. तिचा पती जेम्स हार्बट हा सदर बोटीचा कप्तान असून, ही बोट मस्कत वरून युरोपकडे जाणार होती. दिनांक २६ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी १ च्या सुमारास कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडीहान या बोटीचे टोइंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर लागली आहे, अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड कडून भेटली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
हालचालींवर बारकाईने लक्षसदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस व दहशतवाद विरोधी पथक हे दोघे करत आहेत. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय कोसगाव व केंद्रीय यंत्रणा यांच्याशी सतत संपर्क साधला जात असून, बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा Universal Charger आता एक देश एक चार्जर, सगळ्या वस्तूंसाठी येणार एकच चार्जर, मोदी सरकारने नेमली समिती