महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS-BJP Alliance ? : सध्या युतीची चर्चा नाही! मात्र यांना का मिर्चा झोंबतात; मनसे नेत्याचे ट्विट - Nitin Gadkari Meet With Raj Thackeray

मनसेच्या पाडवा मेळातील राज ठाकरे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेचे वादळ कुठ शांत बोतय ना होतय तोपर्यंतच रविवारी रात्री भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. (Sandeep Deshpande Reply On Twitter) या भेटीने राजकीय खळबळ उडालेली आहे. दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे

By

Published : Apr 4, 2022, 10:33 AM IST

मुंबई - गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या मनसेच्या पाडवा मेळातील राज ठाकरे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेचे वादळ कुठ शांत बोतय ना होतय तोपर्यंतच रविवारी रात्री भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय खळबळ उडालेली आहे. (Nitin Gadkari Meet With Raj Thackeray) ही कौटुंबीक भेट असल्याचे गडकरी यांनी सांगितले असले तरी येणाऱ्या राजकीय समिकरणांची नांदी ठरवणरी ही भेट असणार अशीच सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मनसे नेत्याचं स्पष्टीकरण - यासंदर्भात आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'अद्याप तरी भाजप मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे' देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. (MNS-BJP Alliance Discussion ) पण, सोबतच त्यांनी भविष्यात काय होईल हे माहीत नाही असही म्हटले आहे. त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या सांगण्यातही संधिग्दता आहे. त्यामुळे या चर्चेने चांगलीच उचल खालली आहे.

यांना मिरच्या झोंबतात - एक तर गोष्ट स्पष्ट आहे की, भाजप मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. पण, मनात प्रश्न येतो शिवसेना, राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच वाईट आहे असही ते म्हणाले आहेत.

माझे आणि राज यांचे गेले 30 वर्षांचे संबंध आहेत - राज ठाकरे यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडताना नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझे आणि राज यांचे गेले 30 वर्षांचे संबंध आहेत. हे परिवारीक संबंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी नवीन घरी येण्याये आमंत्रण दिले होते. तसेच, त्यांच्या मातोश्रींनाही भेटायचे होते म्हणून मी गेलो होतो अस गडकरी म्हणाले.

हेही वाचा - नितीन गडकरीनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा, नेमकी सदिच्छा कोणती ते मात्र गुलदस्त्यात

ABOUT THE AUTHOR

...view details