मुंबई -मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबत दरवर्षी प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. पालिकेने नाले सफाई केली तरी दरवर्षी मुंबईची तुंबई होते. पावसापूर्वी नालेसफाई करून काढण्यात आलेला गाळ तसाच पडून राहिल्यास पाण्याचा निचरा होणे कठीण जाते. त्यामुळे, काढण्यात आलेला गाळ तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच, पावसाळ्यासाठी महापालिका सज्ज झाली असून पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
हेही वाचा -दक्षिण मुंबईत 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक, म्हाडाकडून यादी प्रसिद्ध
आढावा बैठक
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पावसाळ्यासाठीच्या तयारीबाबत झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, 'बेस्ट' उपक्रमाचे महाव्यवस्थापक, सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, तसेच मुंबई पोलीस, मध्य व पश्चिम रेल्वे, म्हाडा, एमएमआरडीए, मुंबई मेट्रो संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये पर्जन्य जल वाहिन्या खात्यातील टीम तैनात करण्यात आली आहे. ज्या परिसरांमध्ये पाण्याचा निचरा कमी वेगाने होत असल्याचा अनुभव आहे, अशा सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून डिझेलचा पुरेसा साठा असल्याची खातरजमा वेळोवेळी करण्यात येत आहे. याबाबत सर्व विभागांमध्ये रंगीत तालिम देखील घेण्यात आली आहे.
मॅनहोलची तपासणी
महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी पावसाळी जाळ्या आहेत, तसेच पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणाऱ्या पावसाळी जाळ्या आदींची तपासणी विभाग स्तरावर वेळोवेळी करण्यात यावी. पावसाळी जाळ्यांबाबत साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घ्यावीत, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. ज्या ठिकाणी 'मॅनहोल' आहेत, शिवाय ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणारे मॅनहोलची तपासणी केली जाणार आहे. साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घेतले जाणार आहेत.
प्रमुख रुग्णालयांमधील परिसरात पाणी साचू नये यासाठी यंत्रणा