महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रामदास आठवलेजी तुम्ही केंद्रात मंत्री आहात, आता तुम्हीच महाराष्ट्राला मदत आणून द्या - अजित पवार - अजित पवारांची रामदार आठवलेंना मदत करण्याची मागणी

रामदास आठवले आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनीच आता महाराष्ट्राल मदत करावी, असी खोचक विनंतीदेखील अजित पवार यांनी आठवले यांना केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टीज पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

ajit pawar statement on petrol price hike
रामदास आठवलेजी तुम्ही केंद्रात मंत्री आहात, आता तुम्हीच महाराष्ट्राला मदत आणून द्या - अजित पवार

By

Published : May 31, 2021, 5:59 PM IST

Updated : May 31, 2021, 8:27 PM IST

मुंबई -तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ गुजरातचा दौरा केला. तसेच राज्य सरकारने मदत मागायच्या आधीच हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यावरून उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांनी चिमटा काढला. वादळानंतर मोदींनी गुजरातचा दौरा केला, मात्र महाराष्ट्राचा दौरा का केला नाही, हे अद्यापही आम्हाला कळू शकले नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तसेच या कार्यक्रमात उपस्थित केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. त्यामुळे रामदास आठवले आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनीच आता महाराष्ट्राल मदत करावी, असी खोचक विनंतीदेखील त्यांनी आठवले यांना केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टीज पुस्तकाचे प्रकाशन आणि राजणोली उड्डाणपुलाच्या ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे व दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचे लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रतिक्रिया

पेट्रोल दरवाढीवरून भाजपाला चिमटा -

राज्यात पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात 'तुतू-मैमै' सुरू आहे. राज्य सरकाने पेट्रोलवरील कर कमी करावे, असी मागणी विरोधांकडून होत आहे. यासंदर्भात उत्तर देताना केंद्र सरकारने त्यांचा कर कमी केला, तर नक्कीच सामान्य नागरिकांना पेट्रोल दरवाढी बद्दल दिलासा मिळेल,असे अजित पवार यांनी म्हटले.

'कोरोना काळात विकास कामांना खीळ बसू दिली नाही' -

मुंबईमधील पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था कशाप्रकारे वाढविल्या जात आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. राज्यात कोरोनासारखी महामारी असताना राज्याच्या विकासकामांना खीळ बसू दिली नाही, असे यावेळी अजित पवार म्हणाले. साताऱ्यातील खटाव तालुक्यात 24 तासांत 30 किलोमीटरचा दर्जेदार रस्ता तयार करण्याचा विक्रम राज्य सरकारने केला. त्याची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने देखील घेतली. तसाच विक्रम मुंबई महानगर पालिकेने करावा, असे सल्ला अजित पवारांनी दिला. रात्री 8 ते सकाळी 8 वाजेच्या 12 तासांच्या दरम्यान दहा किलोमीटरचा कॉंक्रीट रस्ता महानगरपालिकेने करून दाखवावा, असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंबईत सार्वजनिक काम अत्यंत हळू चालत आल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. तसेच मुंबई वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांची बांधणी हे एक आव्हान असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Anandayya Medicine: कोरोना उपचारासाठी 'आनंदय्या' औषधास परवानगी, आंध्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Last Updated : May 31, 2021, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details