महाराष्ट्र

maharashtra

'लवकरच महाविकास आघाडी सरकारचे होणार विसर्जन'

By

Published : Aug 13, 2020, 7:25 PM IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवारबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज झाले आहेत. तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल. असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

रामदास आठवले
रामदास आठवले

मुंबई - पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. तिन्ही पक्षाचे अंतर्गत वाद आणि बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे काही खरे नाही. श्री गणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल, असे दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केला आहे. आज बांद्रा येथील त्यांच्या संविधान निवासस्थानी 'आय विटनेस ब्युरो' या पोलीस आणि नागरिकांना उपयुक्त वेबसाईटच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.

रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

'बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार चांगले असले, तरी काही प्रमाणात कलाकारांवर अन्याय होतो. अमिताभ बच्चनसारख्या कलाकाराला ही सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला, त्यानंतर ते बिगबी झाले. त्यामुळे सुशांतसिंह या कलाकारावर अन्याय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयद्वारे झाली पाहिजे. अशी आम्ही मागणी केली होती. मुंबई पोलीसांचा जगात नावलौकिक आहे. त्यातुलनेत सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेगवान झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची केलेली मागणी रास्त आहे. या पूर्वीही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा होत नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण एखादे प्रकरण सीबीआय चौकशी साठी द्यावे ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणे असा होत नाही.त्यामुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी.' ही आमची मागणी आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा -शरद पवारांचे कोणतेही विधान निरर्थक नसते - संजय राऊत

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवारबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज झाले आहेत. तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल. अशी शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडीच्या कंपूत भीती आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असे विधान केले. सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे, मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत आणि बहुमत असणारे सरकार आहे. या सरकारला 2024 पर्यंत धोका नाही. तसेच 2024ची निवडणूक देखील मोदी सरकार जिंकेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -प्रत्येक परदेशी उत्पादनावर बहिष्कार घालणे असा स्वदेशीचा अर्थ नव्हे - मोहन भागवत

ABOUT THE AUTHOR

...view details