महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rains in Maharashtra: राज्यात पावसाचा जोर कायम! आतापर्यंत 89 जाणांचा मृत्यू, तर 8 हजार नागरिकांचे स्थलांतर - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणता पाऊस आहे

सध्या राज्यभरात पाऊस सुरू आहे. परंतु, काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. ( Rains in Maharashtra ) काही ठिकाणी दरड कोसळल्या आहेत तर काही ठिकाणी घर कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पालघर वाघरा-पाडा येथे दरड कोसळल्याने एक घर डिघाऱ्याखाली गेले. त्यामध्ये एकजणाचा मृत्यू झाला, दोनजण गंभीर जखमी आहेत. तर, एकजण बेपत्ता आहे.

पावसामुळे लोकांचे स्थलांतर
पावसामुळे लोकांचे स्थलांतर

By

Published : Jul 13, 2022, 4:07 PM IST

मुंबई -आतापर्यंत राज्यात 346 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती त्या तुलनेत यंदा अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासांत राज्यात सरासरी 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये गडचिरोली नागपूर पालघर आणि कोकणात सर्वाधिक पाऊस होते आहे. ( Maharashtra receives heavy rainfall ) मुंबई परिसरातही गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस पडला आहे. सांताक्रुज येथे 44 मिलिमीटर पावसाची तर, कुलाबा येथे 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

एकजणाचा मृत्यू झाला - पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 74 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तीन नद्यां अद्यापही इशारा पातळीपेक्षा कमी वाहत आहेत. पालघरमध्ये वाघरा-पाडा येथे दरड कोसळल्याने एक घर डिघाऱ्याखाली गेले. यामध्ये चारजण ढिकाऱ्याखाली दबले होते. त्यापैकी एकजणाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर, एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.

परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला - रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ही पावसाचा जोर वाढला असून रायगड मध्ये ७२ मिलिमीटर तर रत्नागिरी ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, दरड प्रवण व पूरप्रवण भागातील 986 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

लोकांना बाजूच्या निवारा केंद्रांमध्ये सुरक्षित ठिकाणी हलले - गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून साडेसहा लाख पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील लोकांना बाजूच्या निवारा केंद्रांमध्ये सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. राज्यात गेल्या 24 तासात नागपुरात तीन आणि कोकणात दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने पावसातील बळींची संख्या आता 89 वर पोहोचली आहे.

परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली - नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून धरणांचा विसर्ग वाढल्याने पाण्याची पातळी वाढत आहे. आतापर्यंत राज्यातील 7796 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सगळीकडे एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आले आहेत. तसेच, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -शिवसेनेचा ताक फुकून पिण्याचा निर्णय! मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने खासदारांचे बंड थांबणार का? वाचा, सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details