मुंबईत पावसाने घेतला ब्रेक; जनजीवन पूर्वपदावर, सुट्टीमुळे वर्दळ कमी - rain
मुंबईत मागील दोन दिवसांपासुन सुरु असलेला मुसळधार पाऊस सोमवारी सकाळी थांबला आहे. पावसानंतर कुठेही पाणी साचल्याची माहीती नाही. तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने रस्त्यावर नागरिकांची वळदळ कमी असल्याचे पाहण्यात येत आहे.

मुंबईतील रस्त्यावर नागरिकांची वळदळ कमी
मुंबई -शहर आणि उपनगरात मागील ४८ तासात जोरदार पाऊस सुरू होता. मात्र रविवारी रात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला असुन सोमवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली. यामुळे मुंबानगरीतील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
मुंबईत पावसाने घेतला ब्रेक