मुंबई:बालविवाहामुळे मुलींच्या अंगीभूत कौशल्यांवर, ज्ञानावर, सामाजिक सामर्थ्यावर, गतिशीलतेवर आणि स्वायत्ततेवर मर्यादा येते. त्या कौटुंबिक हिंसाचार, अत्याचाराला बळी पडतात. बालवधूंना आरोग्य, शिक्षण आणि इतर वैयक्तिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. विवाहामुळे त्यांना शाळेत जाण्यापासून रोखले जाते. त्याचा आर्थिक परिणाम आजीवन भोगावा लागतो. बालवधूंना गर्भधारणा आणि बाळंतपणांमुळे धोकादायक संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यातूनच घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागते. जबरदस्तीने गर्भधारणा आणि लहान वयात मूल जन्माला घालणे यामुळे मुलीना वैद्यकीय त्रासाला सामोरे जावे लागून शारीरिक समस्या निर्माण होत असल्याचे याचिकेत नमूद कऱण्यात आले आहे.
याचिकेत बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या (Child Marriage Prohibition Act) प्रभावी अंमलबजावणीसाठी काही उपाय सुचवले आहेत. त्यानुसार, संपूर्ण राज्यात विशेष अधिकार्यांची नियुक्ती करावी, या अधिकार्यांच्या निरीक्षणांना न्यायिक महत्त्व दिले जावे आणि तपासाच्या आधारे गुन्ह्यांची नोंद करावी; विशेष नियुक्त अधिकार्यांना मदत करणार्या व्यक्ती किंवा संस्थांना कायदेशीर मान्यता द्यावी. बालविवाहांबाबत प्रभावी भूमिका बजावण्यासाठी विशेष जुवेनाईल पोलिस युनिटची स्थापना करावी. राज्यात सुमारे 1 लाख मुलींचे बालविवाह (About 1 lakh child marriages in state) होतात. त्यामुळे सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पीसीए कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. पीसीएची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार करावी.