महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'नवाब मलिक यांनी कमी बोलावे, त्यांच्या अडचणी कमी होतील' - प्रविण दरेकरांची पत्रकार परिषद मुंबई़

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी कमी बोलावं, कमी बोलल्यास त्यांच्या अडचणी कमी होतील असे दरेकर यांनी म्हटले आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : May 11, 2021, 9:18 PM IST

मुंबई -देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. देशात ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. नवाब मलिक यांनी कमी बोलावं, कमी बोलल्यास त्यांच्या अडचणी कमी होतील, अशा शब्दात विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होतो आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. केवळ केंद्र सरकारला टारगेट करून आणि दुसऱ्या राज्यातील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात, त्यामुळे ते जरा कमी बोलले तर त्यांच्या अडचणी कमी होतील असे प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

'मलिक केवळ केंद्रावर टीका करत आहेत'

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात नवाब मलिक यांनी उपाययोजना सुचवल्याचे कधी आम्ही ऐकले नाही. उपलब्ध व्यवस्था गतिमान कशा होतील याबाबत त्यांनी सूचना केल्याचे मला आठवत नाही. ते केवळ केंद्राला टारगेट करत आहेत, अशा शद्बात दरेकर यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.

'कोरोनाच्या या संकटात सर्वांनी एकत्र यावे'

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत परदेशातून आलेल्या मदतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. वन गिव्ह अँड टेक पॉलिसी असते, आपण परदेशी देशांना मदत केली नसती तर आपल्याला मदत करण्याची भूमिका त्या देशांनी घेतली नसती. संकटाच्या काळात संकुचित विचार करणे योग्य नाही, व्यापक दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. सुसंवादातून चांगल्या समन्वयातून सर्वांनी एकत्रितपणे या संकटाला सामोरे जायला हवे, अशी अपेक्षा नवाब मलिक यांच्याकडून व्यक्त करतो असे देखील यावेळी दरेकर म्हणाले आहेत.

हेही वाचा -रत्नागिरीमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ABOUT THE AUTHOR

...view details