मुंबई - 'आरे' संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत, यापुढे कोणतेही झाड तोडू नये, असे महाराष्ट्र सरकारला सांगितले आहे. त्यानंतर, पर्यावरणप्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या संघर्षाला मिळालेले यश असल्याचे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
'आरे'बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय म्हणाले नेते..? - प्रकाश आंबेडकर
सर्वोच्च न्यायालयाने 'आरे' प्रकरणी आज निकाल देत, झाडांची कत्तल थांबवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यावर आता पर्यावरणप्रेमी समाधान व्यक्त करत आहेत. तर विविध नेत्यांच्या देखील या निकालासंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत.
!['आरे'बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय म्हणाले नेते..?](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4677967-thumbnail-3x2-aarey-reactions.jpg)
Aarey Coloney
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या संघर्षाला मिळालेले यश...
हा एकप्रकारे पर्यावरणप्रेमी व मुंबईकरांचा नैतिक विजय...