महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेचे राज्यप्रमुख कुणाच्या बाजूने? ठाकरे की शिंदे.. बघा काय सांगतात बिहार आणि पंजाबचे राज्यप्रमुख - पंजाबचे शिवसेनेचे राज्यप्रमुख

आमदार खासदारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde शिवसेनेच्या इतर राज्यातील पदाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पंधरा राज्यांपैकी 12 राज्य प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या आल्या होते. मात्र, त्यानंतर हेच सर्व राज्य प्रमुख मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच समोर आला.

बघा काय सांगतात बिहार आणि पंजाबचे राज्यप्रमुख
बघा काय सांगतात बिहार आणि पंजाबचे राज्यप्रमुख

By

Published : Sep 24, 2022, 9:40 PM IST

मुंबईआमदार खासदारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde शिवसेनेच्या इतर राज्यातील पदाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पंधरा राज्यांपैकी 12 राज्य प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या आल्या होते. मात्र, त्यानंतर हेच सर्व राज्य प्रमुख मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच समोर आला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रनंतर इतर राज्यातून शिवसेनेत फूट पाडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उदाहरणाला आहे.

आम्हाला वारंवार आमिष दाखवली जात आहेतया संदर्भात बोलताना पंजाबचे राज्यप्रमुख योगराज शर्मा Punjab State President Yograj Sharma म्हणाले की, त्या ज्या काही बातम्या आल्या त्या पूर्णपणे थोतांड आणि चुकीच्या आहेत. सर्व राज्य प्रमुख त्यांची काम घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. सर्वांनी एकत्र त्यांचा वेळ मागितला होता. मात्र, कोणीही त्यांना समर्थन दिलेलं नाही. ही गोष्ट सत्य आहे की शिंदे गटाकडून आम्हाला वारंवार त्यांच्याकडे येण्यासाठी संपर्क होत आहे. मात्र, आम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. आम्ही अशा आमिषांना बळी पडणार नाही. त्यांनी जे काही फोटो व्हायरल केले ते चुकीचे आहेत. त्यांचे पितळ आता उघड पडलेल आहे. आम्ही अजून देखील शिवसेनेतच आहोत.

बघा काय सांगतात बिहार आणि पंजाबचे शिवसेनेचे राज्यप्रमुख

महाराष्ट्राचा बदला बिहारने घेतलाबिहारचे राज्यप्रमुख कौशल्येंद्र शर्मा म्हणाले की, मित्र पक्षांना संपवणे हा भाजपचा डाव आहे. जे महाराष्ट्रात घडलं तेच आमच्या बिहारमध्ये घडत होतं. महाराष्ट्रात भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर, बिहारमध्ये जनता दलाला संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात होता. पण, भाजपच्या हा डाव वेळीच लक्षात आल्याने जनता दल भाजपमधून सत्तेतून बाहेर पडलं आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र सत्ता स्थापन केलं. महाराष्ट्र जे काही झालं त्याचा बदला आम्ही बिहारमध्ये घेतला.

इतर राज्यात काय स्थितीशिवसेनेची इतर राज्यातली स्थिती कशी आहे ? असा प्रश्न या दोन राज्य प्रमुखांना विचारलं असतं ते सांगतात, शिवसेनेचे उगम स्थान हे महाराष्ट्रात आहे. शिवसेनेचा पाया महाराष्ट्रात आहे. इतर राज्यात पाहिलंत तर शिवसेनेची इतकी ताकद मजबूत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जसे दोन गट पडले. त्या प्रकारची स्थिती इतर राज्यांमध्ये दिसून येत नाही. त्या त्या राज्यांमध्ये तिथले स्थानिक पक्ष मजबूत आहेत. त्या पक्षनेते कार्यकर्ते शिवसेनेकडे नाहीत त्यामुळे अद्याप तरी इतर राज्यांमध्ये शिवसेनेत फूट पडलेली नाही. Shivsena bihar punjab

ABOUT THE AUTHOR

...view details