महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Gadkari meet Amitabh Bacchan नितीन गडकरींनी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी घेतली भेट, या विषयावर मागितले समर्थन - नितीन गडकरी अमिताभ बच्चन भेट

अभिनेते अमिताभ बच्चन हे मुंबईतील वाहतूक शिस्तीबाबत अनेकदा चिंता व्यक्त करत असतात. ते लवकरच रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या मिशनमध्ये सामील होऊ शकतात. दोघांच्या भेटीची छायाचित्रे शेअर करत नितीन गडकरी Road Transport Minister Nitin Gadkari यांच्या कार्यालयाने ट्विट आहेत.

Nitin Gadkari meet Amitabh Bacchan t
अमिताभ बच्चन नितीन गडकरी

By

Published : Aug 19, 2022, 8:22 AM IST

मुंबईकेंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत बिग बी अमिताभ बच्चन यांची घरी भेट घेतली. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या चॅम्पियनसाठी मोहिमेला समर्थन द्यावे, गडकरींनी बिग बीशी बोलताना सांगितले. या भेटीवेळी अभिषेक बच्चनही उपस्थित होता.

अभिनेते अमिताभ बच्चन हे मुंबईतील वाहतूक शिस्तीबाबत अनेकदा चिंता व्यक्त करत असतात. ते लवकरच रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या मिशनमध्ये सामील होऊ शकतात. दोघांच्या भेटीची छायाचित्रे शेअर करत नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने ट्विट आहेत. ट्विटमध्ये म्हटले, की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. गडकरींनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान मजबूत करण्यासाठी National Road Safety Mission i बच्चनजी यांचे समर्थन मागितले.

रस्त्यांची पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेतील दर्जाप्रमाणे करणारदेशातील रस्त्यांची पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेतील दर्जाप्रमाणे करणार road infrastructure equivalent to USA असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Road Transport Minister Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात Question Hour in the Upper House खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. रस्ते सुरक्षेसाठी लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी awareness for road safety सांगितले.

रस्त्यांवर वाढलेले अपघात चिंताजनक बाबभारतामध्ये लोकांना चालकाचा परवाना सहजरित्या मिळत असल्याचे त्यांनी काँग्रेस खासदार एल. हनुमनथैया ( Congress MP L Hanumanthaiah ) यांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. रस्त्यांवर वाढलेले अपघात ( number of accidents on National Highway ) ही चिंताजनक बाब आहे. त्यावर सरकारकडून योग्य ती उपाययोजना सुरू असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले होते.

दरवर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यूदरवर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. ही आकडेवारी युद्धामधील होणाऱ्या मृत्यूहून जास्त आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्र black spots of accidents पाहिली जातात. तिथे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.

दर चार मिनिटाला अपघात२०१९ च्या रस्ता अपघात अहवालानुसार, देशात २०१९ मध्ये ४ लाख ४९ हजार २ अपघात झाले आणि त्यात १ लाख ५१ हजार ११३ लोकांचे मृत्यू झाले तर, ४ लाख ५१ हजार ३६१ जण जखमी झाले. एकूण रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ८४ टक्के लोक हे १८ ते ६० या काम करण्यास सक्षम अशा वयोगटातील होते. तर अपघातात बळी पडलेले आणि गंभीर जखमी झालेले ५४ टक्के लोक हे रस्त्यांचा वापर करणारे मूलतः पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी स्वार या वर्गातील होते. दर चार मिनिटाला अपघातात होतात.

हेही वाचा Dahi Handi दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details