महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अजून वेळ गेली नाही केंद्रसरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा - नवाब मलिक - News about agricultural law

अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा अशी मगाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. त्यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टिका केली.

Nawab Malik said that the central government should withdraw the law in time
अजून वेळ गेली नाही केंद्रसरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा - नवाब मलिक

By

Published : Jan 12, 2021, 5:17 PM IST

Updated : Jan 12, 2021, 5:28 PM IST

मुंबई -अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिल्यानंतर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

अजून वेळ गेली नाही केंद्रसरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा - नवाब मलिक

सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्यादृष्टीने हे पहिले पाऊल असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. केंद्रसरकारने अजूनही वेळ गेली नाही. सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडले पाहिजे. तिन्ही कायदे मागे घेऊन नव्याने कायदा करण्यासाठी प्रस्ताव तयार केला पाहिजे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Last Updated : Jan 12, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details