महाराष्ट्र

maharashtra

दंगल घडवण्याचे भाजपचे षड्यंत्र.. दंगल हे भाजपचे शेवटचं हत्यार, नवाब मलिकांचा आरोप

By

Published : Nov 15, 2021, 3:51 PM IST

Updated : Nov 15, 2021, 4:18 PM IST

भारतीय जनता पक्षाकडून जाणून-बुजून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठं षड्यंत्र आहे. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस तो बदनाम व्हायला लागतो त्यानंतर ते आपलं शेवटचं हत्यार म्हणून दंगल घडवतो, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Nawab Malik
Nawab Malik

मुंबई - नांदेड, मालेगाव आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये शुक्रवारी 12 नोव्हेंबरला बंद पुकारण्यात आला होता. या बंदला काही प्रमाणात हिंसक वळण लागलं. आंदोलनाला ज्या कोणी हिंसक वळण लावलं त्यांच्यावर राज्य सरकार कठोर कारवाई करेल. मात्र शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाकडून जाणून-बुजून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठं षड्यंत्र आहे. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस तो बदनाम व्हायला लागतो त्यानंतर ते आपलं शेवटचं हत्यार म्हणून दंगल घडवतो, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकयांनी केला आहे.

तसेच अमरावतीमध्ये काही तरुणांना पैसे देऊन भाजप नेते अनिल बोंडे यांनी दंगल घडवून आणली. म्हणून अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक केली असल्याचे यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

नवाब मलिक पत्रकारांशी बोलताना
लवकरच याबाबत सर्व पुरावे समोर आणणार -
भारतीय जनता पक्ष सर्व मोर्चावर मागे पडलेली आहे. राज्यात त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे न राहिल्यामुळे शेवटचे हत्यार बनवून राज्यांमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा असून याबाबत राज्य सरकार लवकरच पुरावे समोर आणतील, असा इशाराही नवा मलिक यांनी यावेळी दिला.
Last Updated : Nov 15, 2021, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details