महाराष्ट्र

maharashtra

Mamata Banerjee Relief : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

By

Published : Feb 25, 2022, 6:26 PM IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee ) काही दिवसापूर्वी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणी करिता मुंबईतील भाजप कार्यकर्ते यांनी माझगाव दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना 2 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली यावर ममता बॅनर्जी यांना आज ( शुक्रवार) मुंबई सत्र न्यायालयाने माझगाव दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ममता बॅनर्जी यांना दिलासा ( Mamata Banerjee Relief ) दिला आहे.

Mamata Banerjee Relief
ममता बॅनर्जी

मुंबई -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee ) काही दिवसापूर्वी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणी करिता मुंबईतील भाजप कार्यकर्ते यांनी माझगाव दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना 2 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली यावर ममता बॅनर्जी यांना आज ( शुक्रवार) मुंबई सत्र न्यायालयाने माझगाव दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ममता बॅनर्जी यांना दिलासा ( Mamata Banerjee Relief ) दिला आहे.

पुढील सुनावणी 25 मार्चला होणार -

मुंबईतील कोर्टापुढे हजर राहण्याच्या निर्देशांना दिली स्थगिती 2 मार्चच्या सुनावणीत हजेरी लावण्यासाठी माझगाव दंडाधिकारी कोर्टाकडनं जारी झालेल्या समन्सला स्थगिती मुंबई सत्र न्यायालयाने दिली असून याचिकेवर पुढील सुनावणी 25 मार्चला होणार आहे. ममता दिदिंनी नुकत्याच झालेल्या मुंबई दौ-यात राष्ट्रगीताचा अवमान केल्याचं प्रकरण भाजप कार्यकर्त्याकडनं ममता बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं मुंबईत 1 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान आणि अनादर केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्र गीताचा अपमान केल्या प्रकरणी कोर्टा समोर आईपीसी कलम 156 ( 3 ) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्या संदर्भात आदेश देण्याची मागणी करणारी याचिकावर आज सुनावणी झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण -

ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात खुर्चीवर बसलेल्या असतानाच, राष्ट्रगीताला सुरुवात केली. चार-पाच ओळी गायल्यानंतर त्या थांबल्या, असं तक्रारीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली. ममता बॅनर्जी यांनी खुर्चीवर बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यानंतर त्या जागेवरून उठल्या. त्यांनी चार ते पाच ओळी गायल्यानंतर थांबल्या. मुख्यमंत्र्यांनी बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. राष्ट्रगीताचा अपमान केला तसेच संपूर्ण देशाचाही अपमान केला असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा -Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना पोटदुखी, जेजे रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details