मुंबई -मुंबईला सात तलाव आणि धरणांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणांमध्ये गेल्या महिनाभरात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पाणीसाठा वाढत नव्हता. मात्र गेल्या काही दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे गेल्या चार दिवसात २ लाख ६८ हजार ९२२ दशलक्ष लिटर म्हणजेच ७० दिवसाचा पाणीसाठा वाढला आहे. धरणांमध्ये सध्या १३८ दिवस म्हणजेच ४ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सुमारे ९ लाख दशलक्ष लिटर पाण्याची आणखी आवश्यकता आहे. यामुळे मुंबईकरांवर असूनही पाणी कपातीची टांगती तलवार आहे.
७० दिवसांचा पाणीसाठा चार दिवसात वाढला -
मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा असतो. दीड कोटी मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावातून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. जूनच्या सुरूवातीला चार दिवस पाऊस पडल्यावर पावसाने दडी मारली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवार शनिवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. तलावक्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत आहे. १७ जुलैला तलावांमध्ये २ लाख ६२ हजार ८१२, १८ जुलैला २ लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लिटर इतका म्हणजेच १९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या चार दिवसात सुमारे १७ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या चार दिवसात २ लाख ६८ हजार ९२२ दशलक्ष लिटर म्हणजेच ७० दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे.
मुंबईला पेयजलासाठी ९ लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता -