महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bhima Koregaon Case : मुंबई उच्च न्यायालयाचा वरवरा राव यांना दिलासा; आत्मसमर्पणची मुदत 3 मार्चपर्यंत वाढवली

भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon Case ) आणि एल्गार परिषद ( Elgar Parishad ) माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Vara Vara Rao Bail ) यांना जामीन याचिकेवर दिलेला दिलासा कायम ठेवला होता. शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वरावरा राव यांची ( Vara Vara Rao Surrender Date Increase ) आत्मसमर्पणाची मुदत 3 मार्चपर्यंत वाढवली आहे.

By

Published : Feb 27, 2022, 8:36 PM IST

Vara Vara Rao Case
Vara Vara Rao Case

मुंबई -भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon Case ) आणि एल्गार परिषद ( Elgar Parishad ) माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Vara Vara Rao Bail ) यांना जामीन याचिकेवर दिलेला दिलासा कायम ठेवला होता. वरवरा राव यांना आत्मसमर्पण करण्याची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपणार होती. शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वरावरा राव यांची ( Vara Vara Rao Surrender Date Increase ) आत्मसमर्पणाची मुदत 3 मार्चपर्यंत वाढवली आहे.

जामीन अर्जाला एनआयएचा विरोध -

भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांना सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोर्टाकडून जामीन मिळाला होता. वरावरा राव यांना 28 ऑगस्ट 2018 रोजी भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार तसेच शहरी नक्षलवाद प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. वरावरा राव यांनी फेब्रुवारी 2021मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना मंजूर केलेल्या वैद्यकीय जामीनाची मुदतवाढ मिळावी, या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. त्यावेळी वरावरा राव यांना 3 मार्चपर्यंत आत्मसमर्पणाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती एसएस शिंदे आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. oरम्यान, एनआयएच्यावतीने राव यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. राव यांना गंभीर आजार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद कऱण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन अवधी वाढवून देऊ नये, अशी मागणीही एनआयएने केली.

काय आहे याचिका -

भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले ८२ वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव यांना आजारपणाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात वरवरा राव यांना कडक अटी शर्तींवर अंतरिम जामीन मंजूर करताना वैद्यकीय जामीनाचा कालावधी संपण्यापूर्वी शरण येण्याचे निर्देश दिले होते. राव सध्या मालाड येथे भाड्याने राहत असून पुढील उपचारांचा खर्च त्यांना परवडत नसल्याने त्यांना हैद्राबाद येथील निवासस्थाळी जाण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच राव यांचा जामिनाचा अवधीही वाढविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वरवरा राव यांच्यातीने दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी १०३ नवे रुग्ण; शून्य मृत्यूची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details