महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 7, 2022, 8:17 PM IST

ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत ३१६ कोरोना रुग्णांची तर ३ जणांचा मृत्यू

मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे (Mumbai Corona Update). हा प्रसार आता कमी झाला आहे. मुंबईत ३१६ कोरोना रुग्णांची तर ३ जणांचा मृत्यू नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २२१८ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार आता कमी झाला आहे. आज ३१६ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २२१८ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

३१६ नवे रुग्ण -मुंबईत आज ७ सप्टेंबरला कोरोनाच्या ८०७५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३१६ रुग्णांची नोंद झाली. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. ६३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४७ हजार ०४१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २५ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २२१८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २२४९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३१ टक्के इतका आहे.


रुग्णसंख्या घटतेय -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, ४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६ रुग्णांची नोंद झाली आहे.


१२० वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १२० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात १ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details