महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 30, 2022, 4:14 PM IST

ETV Bharat / city

राज्यपाल कोश्यारी लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करतायेत : सुप्रिया सुळे

समान वागणूक देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. राज्यपाल कोश्यारी लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकं दुखावले आहेत. मी राष्ट्रपतींना राज्यपालांना हटवण्याची विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

MP supriya sule
राज्यपाल कोश्यारी - सुप्रिया सुळे

मुंबई - प्रत्येकाला समान वागणूक देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. राज्यपाल कोश्यारी लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकं दुखावले आहेत. मी राष्ट्रपतींना राज्यपालांना हटवण्याची विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर 10 दिवसांनी दिल्लीला जातात. पुढच्या वेळी जेव्हा त्यांच्यापैकी एकाने दिल्लीला भेट दिली, तेव्हा त्यांनी राज्यपालांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवायला हवे अशी विनंती केंद्राला करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details