महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Andheri East By Election: 'भाजपने महाराष्ट्राची राजकीय परंपरा राखली'; मनसेने मानले आभार

भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत (Andheri by election) आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर भाजपने आपला उमेदवार देऊ नये, असे आवाहन केले होते.

By

Published : Oct 17, 2022, 3:53 PM IST

Updated : Oct 17, 2022, 4:01 PM IST

Andheri By Election
Andheri By Election

मुंबई: भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत (Andheri by election) आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर भाजपने आपला उमेदवार देऊ नये, असे आवाहन केले होते. अखेर आज भाजपने आपले अधिकृत उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत मनसेचे नेते व सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आभार मानले आहेत.

भाजपने परंपरा राखली:यावेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला आणि त्या जागी जर घरातील उमेदवार असेल तर ती निवडणूक बिनविरोध केली जाते. ही परंपरा कायम ठेवण्यासंदर्भात आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि या पत्रानंतर आपला उमेदवार मागे घेत भाजपने परंपरा राखली."

राज ठाकरे यांनी ट्विट करून मानले आभार:भाजपने पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती वाढावी आणि राजकीय पक्षांनी राजकीय मंचांवर निकोप स्पर्धा करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच काम करत असते, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.

सर्वांच्या मनात हेच होतं:संदीप देशपांडे पुढे बोलताना म्हणाले की, ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वांच्याच मनात होतं ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ऋतुजा लटके यांची निवड बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा होती. राज ठाकरे यांनी पत्र लिहिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत हीच मागणी केली होती.

आम्ही शरद पवार यांचे खास आभार मानतो. आता ऋतुजा लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालाय, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी शेवटी दिली आहे.

Last Updated : Oct 17, 2022, 4:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details