महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 9, 2022, 12:58 PM IST

ETV Bharat / city

Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूर यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात!

महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू ठेवले. असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही फोन करून हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता बविआच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे. ( MLA Hitendra Thakur about MLC election )

Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर

मुंबई -राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या पक्षाची ३ मत कुणाला देणार? हे अद्याप गुलदस्त्यात ठरवल्याने या निवडणुकीची रंगत अजून वाढली ( MLA Hitendra Thakur about MLC election ) आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत कधी नाही ती चुरस निर्माण झाली आहे. अशात अपक्षांच्या मतांना भाव आला आहे. त्यातही ३ आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे शिवसेना आणि भाजपचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू ठेवले. असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही फोन करून हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता बविआच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

ठाकूरांना मनवण्यासाठी बरेच प्रयत्न! - निवडणूक जाहीर झाल्या नंतर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्या नंतर शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊत यांनीही सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ठाकूर यांची भेट घेतली होती. भाजपचे संकट मोचक आमदार गिरीश महाजन यांनीही ठाकूर यांची भेट घेतली. आघाडीचे शिष्टमंडळ ठाकूर यांना भेटायला आले होते. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे माजी खासदार अशोक मोहोळ, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांचा समावेश होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही फोन वरून चंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. तरीही हितेंद्र ठाकूर यांनी आपले पत्ते अजून ओपन केले नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत ही उत्कंठा राहणार आहे. निवडणूक राज्यसभेची असली तरी सद्या या निवडणुकीचे केंद्र बिंदू हे वसई तालुका झाले आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी भोवती राजकारण फिरत आहे. शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार उभा केल्याने निवडणूक अटीतटीची झाली असल्याने एकेक मतांसाठी भाजप आणि मविआ हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहे.

संजय राऊत यांनी केली ठाकूरांची प्रशंसा! -या सर्व घडामोडी होत असताना हितेंद्र ठाकूर यांच्या पाठिंब्यावर बोलताना शिवसेना नेते व खासदार संजय राऊत म्हणाले की, हितेंद्र ठाकूर हे त्यांच्या परिवारातले आहेत. ते मनमोकळे नेते आहेत व ते स्पष्ट बोलणारे सुद्धा आहेत. त्यांचा आग्रह त्यांच्या भागातील विकास कामांसाठी आहे. त्यांच्या भागात त्यांच्या विभागात विकास कामे झाली नाहीत यासाठी त्यांचा आग्रह असेल तर ते योग्य आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. त्यातच समाजवादी पक्ष व प्रहार जनशक्ती पक्षानेही त्यांचा पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला जाहीर केला आहे. आता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची तीन मत निर्णायक ठरणार हे नक्की.

एकनाथ शिंदे प्रचारापासून दूर? - पालघर जिल्हा असो किंवा वसई विरार महानगर पालिका निवडणूक असो. प्रत्येक वेळी नगरविकास मंत्री आणि पालघरचे प्रभारी एकनाथ शिंदे हे सेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणूक प्रचारातून शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना राज्यसभेच्या निमित्ताने या निवडणुकीत तडजोड करण्याची मोठी संधी आमदार हितेंद्र ठाकूर यांना चालून आलेली आहे. या संधीचा ते कशाप्रकारे फायदा करून घेतात हे पाहणे सुद्धा गरजेचे असून, हे चित्र लवकरच म्हणजे उद्या सायंकाळी चार वाजायच्या आत स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा -Raj Thackeray : राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाने पुन्हा बजवला अजामीनपात्र वॉरंट

ABOUT THE AUTHOR

...view details