महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Congress Protest PM Statement : पंतप्रधान माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - अतुल लोंढे - महाराष्ट्र काँग्रेस पंतप्रधान मोदी वक्तव्य निषेध

काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंडमधील कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन ( Mumbai congress protest in Mulund ) करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ( Police arrest Bhai Jagtap in Mumbai ) ताब्यात घेतले.

काँग्रेसचे मुलुंडमधील आंदोलन
काँग्रेसचे मुलुंडमधील आंदोलन

By

Published : Feb 21, 2022, 7:51 PM IST

Updated : Feb 21, 2022, 7:58 PM IST

मुंबई - लोकसभेत पंतप्रधानांनी भाषण करताना महाराष्ट्रातून आलेल्या मजुरांमुळेच देशभरात कोरोना पसरला असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागत नाही, तोपर्यंत राज्यभरात कॉंग्रेसकडून असेच आंदोलन सुरू राहणार असल्याचे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ( congress protest PM statement ) म्हटले आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले ( Atul Londhe slammed BJP over PM ), की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कितीही काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळले. तरी, हे आंदोलन थांबणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रासहित छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना भाजपाचे खासदार लोकसभेत बाक वाजवित होते. त्यामुळे महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना आणि मंत्र्यांना कधीही माफ करणार नाही. त्यामुळे जोपर्यंत पंतप्रधान महाराष्ट्राची माफी मागत नाही, तोपर्यंत, काँग्रेसकडून असेच आंदोलन सुरू राहणार आहे.

हे आंदोलन थांबणार नाही

हेही वाचा-चोरट्यांनी आधी देवीचे दर्शन घेतले, नंतर दानपेटीवर मारला डल्ला.. पाहा व्हिडिओ

काँग्रेसचे मुलुंडमध्ये आंदोलन

काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंडमधील कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन ( Mumbai congress protest in Mulund ) करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ( Police arrest Bhai Jagtap in Mumbai ) ताब्यात घेतले.

हेही वाचा-KCR Maharashtra Visit : 'काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी शक्य नाही', मंत्री यशोतमी ठाकुरांचा पुर्नउच्चार

काँग्रेसकडून पंतप्रधानांचा निषेध

मोदी सरकारने महाराष्ट्रातून कोरोनाचा प्रसार झाला, असा आरोप केला. त्यांच्या विधानातून देशाच्या अखंडतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटलेले चुकीचे आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. केंद्राकडून मदत मिळाली नव्हती, असा दावा करत विविध जिल्ह्यात काँग्रेसने पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध यापूर्वीच केला आहे.

हेही वाचा-पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला स्वाभिमानीच्या विदर्भ प्रमुखाचा चोप

Last Updated : Feb 21, 2022, 7:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details