महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2021: 'जे अमंगल आहे, ते नष्ट होवो'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गणराया चरणी प्रार्थना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या गणेश चतूर्थीच्या शुभेच्छा

कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

uddhav thackrey
uddhav thackrey

By

Published : Sep 10, 2021, 3:17 PM IST

Updated : Sep 10, 2021, 3:26 PM IST

मुंबई -आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेश चतुर्थीच्या दिल्या. 'जेजे अमंगल आहे, ते नष्ट होवो' अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' बनवा 'ड्राय फ्रूट' मोदक

काय म्हणाले मुख्यमंत्री -

आजपासून श्री गणरायाचे आगमन होत असून, 'जेजे काही अमंगल आहे, ते नष्ट होवो' अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करतो. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे अगदी परदेशातदेखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षीदेखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतो आहे. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असे चित्र असायचे. मात्र, दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असले तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधने आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

'कोरोनातून मुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्न' -

गणरायाला विघ्नहर्ता असे म्हणतात. तो हे संकट कायमचे दूर करेल, अशी मला खात्री आहे. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते. आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनीदेखील कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरू करूया ही शपथ आजच्या या मंगल दिनी घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!

Last Updated : Sep 10, 2021, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details