मुंबई -मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. दरम्यान, येत्या 48 तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसांत राज्यात 5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या.
प्रमुख शहरांचे तापमान -
मुंबई - 28 अंश सेल्सिअस
पुणे - 23 अंश सेल्सिअस
औरंगाबाद - 26.91 अंश सेल्सिअस