महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात 'या' जिल्ह्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात दिवसाला ३ ते ५ हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. २० ऑगस्ट रोजी ५५ हजार ४५४ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. २५ आणि २६ ऑगस्टला ५० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

By

Published : Sep 1, 2021, 5:53 PM IST

कोरोना
कोरोना

मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. यामुळे गेल्या दहा दिवसात राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. मात्र आता ही संख्या पुन्हा वाढू लागली आहे. राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अद्यापही पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर, सांगली, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गोंदिया, नंदुरबार, वर्धा, भंडारा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात सर्वात कमी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

राज्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाच्या दोन लाटा आल्या असून त्या दोन्ही लाटा आटोक्यात आल्या आहेत. यामुळे राज्यात दिवसाला ३ ते ५ हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. २० ऑगस्ट रोजी ५५ हजार ४५४ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. २५ आणि २६ ऑगस्टला ५० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन दिवसाला ५१ हजार इतक्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद होत आहे.

'या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

राज्यात ३१ ऑगस्ट रोजी ५१ हजार २३८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे येथे आहेत. पुण्यात १३५१५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल ठाणे ७०८१, सातारा ५६०२, अहमदनगर ५४४१, सांगली ४२६०, सोलापूर ३७३७, मुंबई ३४६९, कोल्हापूर १३९७, रत्नागिरी येथे १०४५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी गोंदिया येथे २, नंदुरबार येथे ३, वर्धा ५, भंडारा ७, वाशिम ८ तर यवतमाळ येथे ८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

'कोविडची लाट संपलेली नाही'

राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वत:चाच नव्हे तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत. कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा. राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तर ७०० मॅट्रिक टनच्या वर ऑक्सिजन लागल्यास राज्यात लॉकडाऊन लावण्याचा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.


अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

३१ ऑगस्ट - ५१२३८
३० ऑगस्ट - ५१८३४
२९ ऑगस्ट - ५२८४४
२८ ऑगस्ट - ५१८२१
२७ ऑगस्ट - ५१५७४
२६ ऑगस्ट - ५०३९३
२५ ऑगस्ट - ५०१८३
२० ऑगस्ट - ५५४५४


सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे - १३५१५
ठाणे - ७०८१
सातारा - ५६०२
अहमदनगर - ५४४१
सांगली - ४२६०
सोलापूर - ३७३७
मुंबई - ३४६९
कोल्हापूर - १३९७
रत्नागिरी - १०४५

सर्वात कमी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

गोंदिया - २
नंदुरबार - ३
वर्धा - ५
भंडारा - ७
वाशीम - ८
यवतमाळ - ८

हेही वाचा -सुरतच्या दोन ब्रेन डेड मित्रांनी असे दिले 12 रुग्णांना नवीन जीवन

ABOUT THE AUTHOR

...view details