मुंबई -आज(गुरुवारी) दुपारी साडेतीन वाजता राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव्यासह तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सध्या सुरू असलेला लॉकडाऊनबाबतही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना भरपाई-
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्री वादळामुळे राज्याच्या कोकण किनारपट्टीभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या आंबा, काजू, नारळांच्या बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून कोकणाला निसर्ग वादळाप्रमाणे मदत देऊ असे आश्वासन दिले होते. त्यावर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
पदोन्नती आरक्षण