महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra monsoon 2022 : राज्यात मान्सून सक्रिय, 5 दिवसांसाठी मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई महानगर पालिकेकडून मिळालेल्या ( Maharashtra rain updates ) माहितीनुसार, सोमवारी २० जून सकाळी ८ ते मंगळवार २१ जून सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात ४३.८१ मिलिमीटर, पूर्व उपनगरात ३९.५१ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ३७.०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस पडला तरी कुठेही पाणी साचण्याच्या घटना नोंद झालेल्या नाहीत. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू ( Monsoon news today Maharashtra ) आहे.

By

Published : Jun 21, 2022, 8:45 AM IST

मान्सून
मान्सून

मुंबई - मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर गेले काही दिवस पावसाने ( Maharashtra rainfall deficiency ) दडी मारली होती. रविवार १९ जूनपासून पुन्हा मुंबईत पावसाला सुरुवात झाली ( Maharashtra Monsoon Update ) आहे. गेल्या २४ तासात मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगराच्या तुलनेत शहर विभागात जास्त पावसाची नोंद होत आहे. येत्या २४ तासात ऑरेंज अलर्ट दिला असल्याने अतिवृष्टीचा इशारा हवामान ( Mumbai monsoon 2022 prediction ) विभागाकडून देण्यात आला आहे.

राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. आयएमडीकडून 5 दिवसांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई ठाणे व अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत इतका पडला पाऊस - मुंबई महानगर पालिकेकडून मिळालेल्या ( Maharashtra rain updates ) माहितीनुसार, सोमवारी २० जून सकाळी ८ ते मंगळवार २१ जून सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात ४३.८१ मिलिमीटर, पूर्व उपनगरात ३९.५१ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ३७.०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस पडला तरी कुठेही पाणी साचण्याच्या घटना नोंद झालेल्या नाहीत. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू ( Monsoon news today Maharashtra ) आहे.

ऑरेंज अलर्ट- राज्यात रविवारी नैऋत्य मोसमी वाऱ्यासह संपूर्ण भाग व्यापल्याने सोमवारपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात ( Mumbai weather prediction ) today आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
पाणी तुंबण्याच्या ठिकाणी ही व्यवस्था - मुंबईत ३८६ फ्लडिंग पाॅईट्स होते, त्यापैकी यंदा २८२ फ्लडिंग पाॅईट्स कमी झाले आहेत. तर १०४ फ्लडिंग पाॅईट्स असून त्यापैकी ३० फ्लडिंग पाॅईट्स जवळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत ७१ फ्लडिंग पाॅईट्स पूरमुक्त होतील. यंदा पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ४७७ पंप कार्यरत असतील. हिंदमाता परिसर पाण्याखाली जाऊ नये यासाठी भूमिगत टाक्या बसवल्या असून ३ कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो. पावसाचे पाणी साचल्यामुळे पुर आल्यास एन डी आर एफ, नौदल तैनात करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details