मुंबई -देशात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी चिंता वाढविणारी बातमी आहे. आरोग्य विभागाने राज्यात नोंदवलेले BA.2.3.20 आणि BQ.1 सारख्या नवीन व्हेरिंयटमुळे कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात, असा इशारा ( corona cases in Maharashtra ) दिला आहे. विशेषत: हिवाळा आणि सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
सणासुदीत कोरोनाच्या 'या' नव्या व्हेरियंटचा धोका, काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन - महाराष्ट्र कोरोना अपडेट
देशात कोरोनाचे BA.2.3.20 आणि BQ.1 हे व्हेरियंटमुळे प्रथमच आढळून आले आहेत. त्यात असेही म्हटले आहे की कोरोना व्हायरसच्या नवीन XBB प्रकारात BA.2.75 पेक्षा गप्रतिकारक क्षमता आहे. 3 ते 9 ऑक्टोबरच्या तुलनेत राज्यात 10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान कोविड-19 च्या रुग्णांचे प्रमाण 17.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
![सणासुदीत कोरोनाच्या 'या' नव्या व्हेरियंटचा धोका, काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन कोरोना न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16677782-772-16677782-1666072278540.jpg)
देशात कोरोनाचे BA.2.3.20 आणि BQ.1 हे व्हेरियंटमुळे प्रथमच आढळून आले ( Maharashtra corona update ) आहेत. त्यात असेही म्हटले आहे की कोरोना व्हायरसच्या नवीन XBB प्रकारात BA.2.75 पेक्षा गप्रतिकारक क्षमता आहे. 3 ते 9 ऑक्टोबरच्या तुलनेत राज्यात 10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान कोविड-19 च्या रुग्णांचे प्रमाण 17.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: ठाणे, रायगड आणि मुंबई या दाट लोकवस्तीच्या जिल्ह्यांमध्ये ही वाढ दिसून आली आहे. येत्या हिवाळी हंगामात विशेषत: सणासुदीच्या वातावरणात वाढ होण्याचा अंदाज वर्तवत आहेत. WGS (संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग) मध्ये BA.2.75 चे प्रमाण 95 टक्क्यांवरून 76 टक्क्यांवर घसरले आहे. राज्याने XBB ची नोंद केली आहे जी BA.2.75 आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या तुलनेत वाढीचा फायदा असलेला नवीन प्रकार आहे. याशिवाय, राज्याने भारतात प्रथमच BA.2.3.20 आणि BQ.1 प्रकार नोंदवले आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
सार्वजनिक संपर्क टाळावे-आरोग्य विभागाने लोकांना फ्लू सारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी कोविड-19-योग्य वर्तन पाळण्यास सांगितले आहे. तसेच लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. कॉमोरबिडीटीस असलेल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी भेट देताना अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा सारखा आजार असलेल्या व्यक्तींनी शक्य तितके सार्वजनिक संपर्क टाळावे, असे आरोग्य आरोग्य विभागाने म्हटले आहे.