काश्मिरी मुलींचा क्रिकेट संघ प्रथमच मुंबईत दाखल, दिलीप वेंगसरकरांनी केले मार्गदर्शन - काश्मिरी मुलींचा क्रिकेट संघ
काश्मीरमधील अनंतनाग येथील एक मुलींची क्रिकेट टीम पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने काश्मीर मधून बाहेर पडली आहे. त्यांची नुकतीच पुण्यात आसाम रायफलसच्या संघाबरोबर मॅच पार पडली आहे. त्यानंतर आता या मुली आज मुंबई पाहण्यासाठी पहिल्यांदाचं मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी स्वतः प्रसिद्ध माजी कर्णधार दिलीप वेंगसकर उपस्थित होते.
मुंबई - काश्मीरमधील अनंतनाग येथील एक मुलींची क्रिकेट टीम पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने काश्मीर मधून बाहेर पडली आहे. त्यांची नुकतीच पुण्यात आसाम रायफलसच्या संघाबरोबर मॅच पार पडली आहे. त्यानंतर आता या मुली आज मुंबई पाहण्यासाठी पहिल्यांदाचं मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी स्वतः प्रसिद्ध माजी कर्णधार दिलीप वेंगसकर उपस्थित होते. या टीमच विशेष म्हणजे त्यांच्या खेळाचं याआधी सचिन तेंडुलकर आणि इरफान पठाण यांनी देखील कौतुक केलं होत. असीम फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाबाबत बोलताना संघाची कर्णधार म्हणाली की, आशा प्रकारचा उपक्रम आमच्या साठी राबवला यासाठी रोटरी क्लब आणि असीम फौंडेशनचे खुप आभार. असे उपक्रम सतत होणे गरजेचे आहे.
काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यातील डोरू येथील १३ काश्मिरी मुलींचा धाडसी क्रिकेट संघ प्रथमच मुंबई येथे आला असून मुंबईत आल्यावर त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्याशी गप्पा मारत त्यांचे मार्गदर्शन घेतले.