महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देशात लसीचा तुटवडा असताना केंद्राला पाकिस्तानात लस पाठवण्याची घाई - जयंत पाटील - Jayant Patil on Corona Vaccination Mumbai

आपल्या देशातील नागरिकांना लस प्रथम मिळायला पाहिजे. मात्र देशात लसीचा तुटवडा असताना, केंद्र सरकारला पाकिस्तान आणि इतर देशांना लस देण्याची काय घाई आहे? असा प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. समन्वय समितीच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Mar 17, 2021, 5:08 PM IST

मुंबई -आपल्या देशातील नागरिकांना लस प्रथम मिळायला पाहिजे. मात्र देशात लसीचा तुटवडा असताना, केंद्र सरकारला पाकिस्तान आणि इतर देशांना लस देण्याची काय घाई आहे? असा प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. समन्वय समितीच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशातील नागरिकांना लस दिल्यानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून इतर देशांचा विचार करणेही आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार सध्या तरी तसं करताना दिसत नाहीय. सध्या कोरोना प्रतिबंधक लस ही पाकिस्तान आणि इतर देशांना पोहोचवली जात आहे. त्या देशांना देखील मदत केली पाहिजे, परंतु सर्वप्रथम केंद्राने आपल्या देशातील नागरिकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात.

देशात लसीचा तुटवडा असताना केंद्राला पाकिस्तानात लस पाठवण्याची घाई

महाविकास आघाडीत सर्व आलबेल

सध्या महाविकास आघाडीच्या नेत्या संदर्भात अनेक वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र त्या नुसत्या वावड्या असून, त्यामध्ये तथ्य नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. गृह विभागात परिवहन मंत्री अनिल परब यांचा कुठलाही हस्तक्षेप नसून, या केवळ चर्चाच आहेत. महाविकास आघाडीत असलेले प्रत्येक मंत्री हे एकत्र आणि समन्वयाने काम करत आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये चांगला समन्वय असल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details