मुंबई - गुजरातमधून देशभरात ड्रग्ज पसरवले जात आहे. हा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याच्यामध्ये कोणताही राजकीय हेतू न ठेवता यातील संबंधीतांवर कारवाई करून त्यांना तत्काळ एनसीबीने (NCB) अटक करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
एनसीबीच्या डीजींना आवाहन
मनीष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी हे गुजरातमधून ड्रग्जचा धंदा ऑपरेट करत आहेत. ते वारंवार गुजरातमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहातात. गुजरातच्या मंत्र्यांना सातत्याने भेटत असतात. हे लोक गुजरातमधून ड्रग्जचा व्यापार करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, एनसीबीच्या डीजींना आवाहन आहे, की त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या ड्रग्जच्या धंद्याची पाळेमुळे उखडून टाकली पाहिजे असही ते म्हणाले आहेत.