महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 28, 2020, 6:34 PM IST

ETV Bharat / city

विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेस- राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू होईल - नवाब मलिक

महाविकास आघाडी स्थिरावत असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये गेलेले नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीत परत येतील, असे भाकीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

ncp
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई - गेल्या दोन निवडणुकांआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले. पण, आता महाविकास आघाडी स्थिरावत असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर पुन्हा ते नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीत परत येतील, असे भाकीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिम्मित मलिक यांच्याशी 'ई टीव्ही भारत'ने संवाद साधला.

प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची घेततेली मुलाखत

गेल्या वर्षभरात भाजपकडून वारंवार सरकार पडणार सरकार पडणार असे दावे केले. पण, ते दावे फोल ठरले आहेत. सरकार काही पडणार नाही, पण आलेल्या नेत्यांना थोपवून धरण्यासाठी भाजपकडून सरकार पडणार असल्याचे दावे करण्यात येत असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी वरचढ नाही, पवार साहेब मुख्य मार्गदर्शक

प्रसारमाध्यमात महाविकास आघाडीत इतर घटक पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीच वरचढ असल्याचे म्हटले जात आहे. हे खरे नाही, महाविकास आघाडीत सर्वच घटक पक्षांना समान अधिकार आहेत. कोणत्याही विभागात ढवळाढवळ केली जात नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या तुलनेत शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव फार मोठा आहे, त्यामुळे शरद पवार केवळ मार्गदर्शक आहेत. त्यांचा सल्ला हा महत्वाचा आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे हीच पवार यांची इच्छा होती

विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर शरद पवार यांनी पहिली पसंती दिली होती. सरकारला एक नवा चेहरा देण्याची गरज ओळखून त्यांनी महाविकास आघाडीत येताच हा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला सर्वच पक्षांनी एकमताने मंजूर केले.

हेही वाचा -'मुख्यमंत्री असताना फडणवीस धमकी देतच होते! कुंडल्या हातात आहेत, हे कशाचे द्योतक?'

हेही वाचा -...तर लढण्यासाठी पुन्हा एकत्र यावं लागेल - छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details