महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

World Cancer Day 2022 : जाणून घ्या कॅन्सरवरील उपचारपद्धती 'इम्यूनोथेरेपी' विषयी...

भारतात साधारणपणे स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग, फफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग आदींचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात १ लाख लोकसंख्येपाठीमागे ४० ते ५० लोक कॅन्सरचे शिकारी ठरतात.

By

Published : Feb 4, 2022, 3:49 PM IST

इम्यूनोथेरेपी
इम्यूनोथेरेपी

मुंबई -कॅन्सरचे प्रमाण है समाजात वाढत आहे याला कारणीभूत असणाऱ्या घटकांमध्ये व्यसने, लठ्ठपणा ,अन्न घटकांची कमतरता ,जुनाट संसर्ग यांचा समावेश आहे. या सोबतच दुर्बल रोगप्रतिकार क्षमता (इम्युनिटी) हे आपल्या शरीराचे कॅन्सर सारख्या आक्रमणापासून बचाव करतात. त्यामुळे शरीर जागृत करणारी इम्यूनोथेरेपी ही कॅन्सरच्या पेशंटसाठी प्रभावी ठरू शकते असे मत मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय अंदुरे यानी व्यक्त केले. जागतिक कर्करोग जागृती दिनानिमित्त ( World Cancer Day 2022 ) कर्करोगावरील उपचार पद्धतीविषयी जाणून घेऊया

डॉक्टरांची प्रतिक्रिया


अगदी चौथ्या टप्प्याचा कॅन्सरवर इम्यूनोथेरेपीद्वारे उपचारपद्धतीने उपचार करता येतात. कॅन्सर हा आजार एखादया खोलवर मुळे गेलेल्या वटवृक्षासारखा असतो. त्यामुळे ज्याप्रकारे एखादा वटवृक्ष काढण्यासोबत त्याचे मुळे काढणे गरजेचे असते. त्याप्रमाणे कॅन्सर बरा करण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर गरजेनुसार केमोथेरपी व रेडिएशन थेरपी या उपचार पद्धतीने कॅन्सरची पूर्ण ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे, असे मत मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ञ) डॉ. दत्तात्रय अंदूरे यांनी व्यक्त केले. वेळीच निदान व उपचार केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो.

कॅन्सर हा दुर्धर आजार
कॅन्सरविषयीचे ज्ञान, अत्याधुनिक पध्दती हे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचावे तसेच कर्करोगाविषयी जनजागृती केली पाहिजे. तसेच कर्करोग होऊ नये म्हणूनही प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्यांना कॅन्सरची लक्षणे आहेत त्यांनी वेळीच निदान करुन औषधोपचार सुरु करावे. कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. पण वेळीच निदान करून औषधोपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो. भारतात साधारणपणे स्तनाचा कर्करोग, गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग, फफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग आदींचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात १ लाख लोकसंख्येपाठीमागे ४० ते ५० लोक कॅन्सरचे शिकारी ठरतात. कॅन्सर हा व्यसने, लठ्ठपणा, पोषक अन्नघटकांचा अभाव, व्यायामाची कमतरता , दिर्घ संसर्ग व आनुवंशिकता यामुळे होऊ शकतो.त्यामुळे वरील धोकादायक घटकांपासून दूर राहणे हा कॅन्सरपासून बचावाचा उत्तम मार्ग आहे.

हेही वाचा -World Cancer Day : 10 वर्षात कर्करोगाच्या रुग्णांत दुपट्टीने वाढ; जाणून घ्या 10 महत्वाची लक्षणे

ABOUT THE AUTHOR

...view details