महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

High Temperature in MH : राज्यातील सर्वच जिल्ह्यांत हवामान खात्याचा पिवळा अलर्ट; तापमानाचा वाढणार पारा - High Temperature in MH

सोमवारी राज्यातील अकोला जिल्ह्यात पारा ४४ अंशांच्या ( Temperature beyond 44 degrees in Akola ) पुढे गेला होता, हा विक्रमच होता. गेल्या दोन आठवड्यात राज्यात उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या ( Indian Meteorological Department ) अधिकारी सुषमा नायर ( Sushama Nayar on Yellow alert ) यांच्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पिवला अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तापमान वाढले
तापमान वाढले

By

Published : Apr 6, 2022, 7:37 PM IST

Updated : Apr 6, 2022, 7:55 PM IST

मुंबई- एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस हवामान खात्याने पिवळा अलर्ट जारी केला आहे.

सोमवारी राज्यातील अकोला जिल्ह्यात पारा ४४ अंशांच्या ( Temperature beyond 44 degrees in Akola ) पुढे गेला होता, हा विक्रमच होता. गेल्या दोन आठवड्यात राज्यात उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या ( Indian Meteorological Department ) अधिकारी सुषमा नायर ( Sushama Nayar on Yellow alert ) यांच्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सर्वच जिल्ह्यांत हवामान खात्याचा पिवळा अलर्ट

वाढत्या उन्हामुळे आता देशाच्या आर्थिक राजधानीतही मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत. कष्टकरी लोक रोज लिंबूपाणी पिऊन तहान भागवत आहेत. मात्र, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत उष्णता कमी आहे, ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत नोकरदार व घरगुती महिला घराबाहेर पडणे टाळत असल्याचे अनेक भागात दिसून आले आहे.

Last Updated : Apr 6, 2022, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details